शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

उन्हाळ्याआधीच 'जलसंकट'! 2000 रुपयांत 20 लीटर पाणी; टँकरसमोर भल्या मोठ्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 14:12 IST

पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

कावेरी नदीचं पाणी कमी झाल्याने आणि वाढत्या दुष्काळी परिस्थितीमुळे कर्नाटकच्या बंगळुरूमधील काही भागात पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे तेथील लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. पाण्याची वाट पाहावी लागत आहे. बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड, महादेवपुरा आणि आरआर नगरसारख्या भागात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

बंगळुरूमधील अनेक भागात बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एआर नगरच्या संपूर्ण पट्टानगरमध्ये लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकापेक्षा जास्त भांड्यात पाणी घेतल्यास अधिकारी परत पाठवतात, असा आरोप लोकांनी केला आहे.

अधिकारी आपल्या मुलांनाही सोबत राहू देत नसल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. ते मुलांना परत पाठवतात. जनावरांना आंघोळ घालण्यासाठी आणि पाणी पाजण्यासाठीही पाणी नसल्याचं लोक सांगतात. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी अनेक तास रांगेत उभं राहावं लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. 

आरओ प्लांटमधून पिण्याच्या पाण्यासाठी फक्त एकच कॅन घेण्याची परवानगी आहे. आम्हाला आता प्रत्येक कॅनसाठी 2000 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील, ज्यासाठी पूर्वी 600 ते 1000 रुपये आकारले जात होते. त्यांनी खासगी टँकरला पाण्याचे दर कमी करण्यास सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या भागात येणं बंद केलं, असा आरोप लोक करतात. सरकारला दररोज ई-मेल पाठवले जातात, पण आजपर्यंत त्याचा काही उपयोग झाला नाही.

बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट गंभीर होत आहे. तज्ज्ञांनी सरकारला जलसंकटाचा इशारा दिला होता, मात्र सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. शेकडो अपार्टमेंटमध्ये पिण्याच्या पाण्याचा थेंबही नाही. उन्हाळा येण्याआधीच शहरातील सुमारे 50 टक्के बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. लोकांचे यामुळे अतोनात हाल होत असून अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईBengaluruबेंगळूर