शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

उन्हाळ्याआधीच 'जलसंकट'! 2000 रुपयांत 20 लीटर पाणी; टँकरसमोर भल्या मोठ्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 14:12 IST

पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

कावेरी नदीचं पाणी कमी झाल्याने आणि वाढत्या दुष्काळी परिस्थितीमुळे कर्नाटकच्या बंगळुरूमधील काही भागात पिण्याच्या पाण्याचं संकट अधिक गडद झालं आहे. त्यामुळे तेथील लोकांना पाण्याचे टँकर आणि पाणीपुरवठा केंद्रांसमोर तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. पाण्याची वाट पाहावी लागत आहे. बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड, महादेवपुरा आणि आरआर नगरसारख्या भागात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

बंगळुरूमधील अनेक भागात बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एआर नगरच्या संपूर्ण पट्टानगरमध्ये लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकापेक्षा जास्त भांड्यात पाणी घेतल्यास अधिकारी परत पाठवतात, असा आरोप लोकांनी केला आहे.

अधिकारी आपल्या मुलांनाही सोबत राहू देत नसल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. ते मुलांना परत पाठवतात. जनावरांना आंघोळ घालण्यासाठी आणि पाणी पाजण्यासाठीही पाणी नसल्याचं लोक सांगतात. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी अनेक तास रांगेत उभं राहावं लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. 

आरओ प्लांटमधून पिण्याच्या पाण्यासाठी फक्त एकच कॅन घेण्याची परवानगी आहे. आम्हाला आता प्रत्येक कॅनसाठी 2000 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील, ज्यासाठी पूर्वी 600 ते 1000 रुपये आकारले जात होते. त्यांनी खासगी टँकरला पाण्याचे दर कमी करण्यास सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या भागात येणं बंद केलं, असा आरोप लोक करतात. सरकारला दररोज ई-मेल पाठवले जातात, पण आजपर्यंत त्याचा काही उपयोग झाला नाही.

बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट गंभीर होत आहे. तज्ज्ञांनी सरकारला जलसंकटाचा इशारा दिला होता, मात्र सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. शेकडो अपार्टमेंटमध्ये पिण्याच्या पाण्याचा थेंबही नाही. उन्हाळा येण्याआधीच शहरातील सुमारे 50 टक्के बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. लोकांचे यामुळे अतोनात हाल होत असून अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईBengaluruबेंगळूर