गोव्यात 2 हजार 92 बालविवाहांची नोंद
By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30
जनगणनाअहवाल:2001 ते 2011 काळातील वास्तव

गोव्यात 2 हजार 92 बालविवाहांची नोंद
ज गणनाअहवाल:2001 ते 2011 काळातील वास्तवसोनाली देसाई / पणजीराज्यात महिलांची एकूण संख्या 7 लाख 19 हजार 405 आहे. यातील 4 लाख 46 हजार 875 विवाहिता आहेत. 82 हजार 380 महिला विनाअपत्य आहेत. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असला, तरी 15 वर्षांखालील 2 हजार 92 मुलींचेविवाह लग्ने 2001 ते 2011 या काळात झाल्याचेजनगणना अहवालाचसांगतो.बालविवाहांमध्ये बहुतांश स्थलांतरित मजुरांच्या मुलींचा समावेश आहे. गोव्यात विवाहाचे वय मुलींसाठी 18 वर्षे आहे. तरीदेखील राज्याच्या दुर्गम भागांमध्ये बालविवाह होतात, ही गोष्ट जनगणना अहवालातील ताजी आकडेवारी पाहिल्यानंतर कळून येते. उत्तर गोव्यात एकूण 4 लाख 1 हजार 331 महिला आहेत. यातील 2 लाख 51 हजार 383 महिलांचे विवाह झाले आहेत. 47 हजार 979 महिला विनाअपत्य आहेत, तर दोन अपत्ये असलेल्या महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे 68 हजार 822 आहे. कुटुंबात एक अपत्य असलेल्यांची संख्या 54 हजार 440 एवढी असून तीन अपत्ये असणार्यांची संख्या 38 हजार 86 आहे. यात 2 लाख 75 हजार 416 मुलांची संख्या नोंद झाली आहे, तर 2 लाख 43 हजार 471 मुलींची संख्या नोंद आहे.दक्षिण गोव्यात एकूण 3 लाख 18 हजार 74 महिला आहेत. यातील 1 लाख 95 हजार 492 महिला विवाहित आहेत. 34 हजार 401 महिला विनाअपत्य आहेत. दोन अपत्ये असणार्या महिलांची संख्या 54 हजार 599 आहे. कुटुंबात एक अपत्य असलेल्यांची संख्या 40 हजार 851 आहे, तर तीन अपत्ये असणार्या महिलांची संख्या 32 हजार 673 नोंद झाली आहे. यात 2 लाख 16 हजार 162 मुलगे असल्याची नोंद असून 1 लाख 97 हजार 179 मुलींची संख्या नोंद केली आहे.-------------बालविवाह झाल्याची नोंद केलेल्या म्हणजे 15 वर्षांखालील वयातील मुलींची संख्या उत्तर गोव्यात 1 हजार 71 आहे, तर दक्षिण गोव्यात 1 हजार 21 आहे.या वयोगटातील एकूण 2 हजार 92 विवाहितांपैकी 1 हजार 760 विवाहितांना अपत्य नाही, असेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. 15 ते 19 वयोगटात लग्न होणार्या मुलींची संख्या राज्यात 6 हजार 883 आहे.35 ते 39 या वयोगटात लग्न होण्याची संख्या 58 हजार 931 आहे.या वयोगटात एकूण महिला संख्या 62 हजार 757 आहे. त्याखाली 30 ते 34 वयोगटात लग्न होणार्या मुलींची संख्या 55 हजार 309 एवढी जनगणनेत नोंद झाली आहे.