शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

दम भरताच पाकिस्तान वठणीवर; दूतावासात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 07:02 IST

पाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे ही तेथील जबाबदारी आहे, असे या भारताकडून निक्षून सांगण्यात आले.

नवी दिल्ली : पाकिस्तानातीलभारतीय राजदूतावासात काम करीत असलेले दोन भारतीय कर्मचारी सोमवारी ड्युटीसाठी बाहेर पडल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकच्या भारताच्या दूतावासातील अधिकाऱ्याला सज्जड दम भरून जाब विचारताच या दोन भारतीयांना सोडून देण्यात आले आहे.पाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे ही तेथील जबाबदारी आहे, असे या भारताकडून निक्षून सांगण्यात आले. पाकिस्तानात दोन भारतीय कर्मचाºयांना अटक केल्याचे तीव्र पडसाद उमटले. दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या गाड्यांसह भारतीय दूतावासात परत पाठववावे, असे पाकला सुनावण्यात आले. कठोर शब्दात खडसावले जाताच पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही भारतीय कर्मचाऱ्यांना इस्लामाबादमधील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याचे मान्य केले आणि काही वेळातच त्यांना सोडून दिल्याची माहिती दिली.हे दोन्ही कर्मचारी दूतावासातील ड्ऱायव्हर असून मूळचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील आहेत. त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. हे दोघेही सोमवारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घरून निघाले, परंतु कामावर पोहचलेच नव्हते. गेल्या महिन्यात भारतातील दोन पाकिस्तानी कर्मचाºयांना हेरगिरी केल्यावरून ताब्यात घेतले होते. त्यामुळे पाकनेही दोन भारतीयांना गायब केले असावे, असा अंदाज आहे. पाकिस्तानी यंत्रणांनी इस्लामाबादमधील भारतीय राजदूतावासातील अधिकाºयांना त्रास देण्याचे प्रकार काही दिवसांपासून सुरू आहेत. भारतीय राजदूत गौरव अहलुवालिया यांच्यासह इतर अधिकाºयांनाही पाकिस्तानी यंत्रणांनी त्रास दिला आहे. अहलुवालिया यांच्या घराजवळ पाकिस्तानी यंत्रणांच्या व्यक्तींनी केलेल्या भीतीदायक वर्तनाबाबत भारताने तक्रार केली आहे. पाकिस्तानी व्यक्तींनी अहलुवालिया यांच्या वाहनाचा दुचाकीवरून पाठलाग केलेल्या पाठलागाचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. (वृत्तसंस्था)छळ होता कामा नयेपाकिस्तानच्या भारतातील दूतावासातील अधिकारी सय्यदहैदर शाह यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलवून जाब विचारण्यात आला. या दोन्ही अधिकाºयांची चौकशी किंवा कोणत्याही प्रकारचा छळ होता कामा नये, असेही भारताने बजावले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान