शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
5
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
6
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
7
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
8
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
9
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
10
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
11
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
12
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
13
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
14
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
15
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
16
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

पश्चिम बंगालमध्ये बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 7:55 AM

बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भीती

मालदा: पश्चिम बंगालमधल्या मालदात बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत होते. यापैकी २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर बाकीचे प्रवासी बेपत्ता आहेत. सध्या घटनास्थळी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त झालेली बोट बिहारच्या कटिहारमधून पश्चिम बंगालमधल्या मालदाला जात होती. महानंदा नदीमध्ये बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला. मालदा जिल्ह्यातल्या चंचल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुकूंदपूर घाट परिसरात पोहोचण्यापूर्वीच प्रवासी बोट उलटली. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बोटीतून ५० जण प्रवास करत असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी वेगानं बचावकार्य सुरू आहे. बोटीतून प्रवास करणारे सर्वजण दिनाजपूरमध्ये बैच उत्सव पाहण्यासाठी चालले होते.  आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून एकूण प्रवासी संख्या पाहता मृतांची संख्या वाढू शकते, अशी माहिती मालदाचे पोलीस अधीक्षक आलोक रजारिया यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ही घटना घडली. या बोटीत प्रवाशांसह सायकल आणि मोटारसायकलदेखील होत्या. याशिवाय बोटीतील प्रवाशांची संख्यादेखील जास्त होती. सध्या घटनास्थळी पूर्ण क्षमतेनं बचावकार्य सुरू असल्याचं रजारिया यांनी सांगितलं. 

टॅग्स :Accidentअपघात