शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'हा देवाचाच आशीर्वाद'! बोट दुर्घटनेत गमावल्या 2 मुली; दोन वर्षांनी त्याच दिवशी दाम्पत्याला जुळे कन्यारत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:18 IST

2 daughters born on same day after two years : दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण परत आहेत.

नवी दिल्ली - गोदावरी नदीत 15 सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधील अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांनी आपल्या दोन्ही मुलींना गमावलं होतं. या दुर्घटनेनंतर या दाम्पत्याला खूप मोठा धक्का बसला होता. पण आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण परत आहेत. कारण दोन वर्षांनंतर त्याच तारखेला अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांना जुळ्या मुली झाल्या आहेत. घरामध्ये जुळे कन्यारत्न आल्याने 'हा देवाचाच आशीर्वाद' असं म्हणत कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आनंद साजरा केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर 2019 रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काचुलुरूजवळ गोदावरी नदीत एक बोट बुडाली होती. या दुर्घटनेत अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना गमावलं होतं. यापैकी एक मुलगी अवघ्या एका वर्षाची आणि दुसरी मुलगी तीन वर्षांची होती. या दोन्ही मुली यावेळी आपल्या आजीसोबत तेलंगणातील भद्रद्री कोठागुडेम जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावर असलेल्या प्राचीन भद्राचलम मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. मात्र बोटीला भीषण अपघात झाला आणि बोट गोदावरी नदीत उलटून बुडाली होती.

या बोट दुर्घटनेत तब्बल 50 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, आता बरोबर दोन वर्षांनंतर 15 सप्टेंबर याच तारखेला या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांना जुळ्या मुली झाल्या आहेत. "आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे. ही देवाची किमया आहे. हा देवाचाच आशीर्वाद आहे" अशा शब्दांत यावेळी या दाम्पत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोन्ही मुली आणि आई हे अगदी सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Indiaभारत