शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

नवीन मोटर वाहन कायद्याद्वारे केली ५७७ कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:52 AM

नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर देशातील १८ राज्यांत नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी ५७७.५ कोटींचा दंड वसूल केला.

नवी दिल्ली : नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर देशातील १८ राज्यांत नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी ५७७.५ कोटींचा दंड वसूल केला. त्यातील २०१.९ कोटी रुपयांचा सर्वात मोठा वाटा उत्तर प्रदेशचा असून त्यानंतर गुजरात, बिहारचा क्रमांक लागतो. देशात सर्वात कमी दंडवसुली गोव्यामध्ये झाली असून ती ७८०० रुपये इतकी आहे.महाराष्ट्रामध्ये वाहतूकीचे नियम मोडणाºया ६४१६ जणांना ४.१६ लाख रुपये दंड आकारण्यात आला. नवा मोटर वाहन कायदा लागू न केलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. नव्या कायद्यानुसार दंडाची रक्कम वाढविण्यात आलेली असली तरी महाराष्ट्रात अजून तो बदल झालेला नाही.लोकसभेमध्ये यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, न्यायालयाला सादर केलेल्या चलानांमधील रकमेची बेरीज करून दंड आकारणीचा आकडा देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्षात किती दंडवसुली केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्याकरिता जो सर्वोच्च दंड आहे त्यानुसार वाहतूक पोलिसांनी चलान जारी केली. दंडाच्या मोठ्या रकमेमुळे त्याला देशभरात जोरदार विरोधही सुरू झाला. परिणामी गुजरात, उत्तराखंड, तामिळनाडू या राज्यांनी दंडाची रक्कम कमी केली.एखादे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करत नसल्याचा एकही अहवाल आमच्या खात्याकडे आलेला नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगत असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुधारित दंडाच्या रकमेबाबत अनेक राज्यांनी अद्याप अधिसूचना जारी केलेली नाही.अपघात झाले कमीभूपृष्ठ वाहतूक खात्याने म्हटले आहे की, नव्या मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर यंदा सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. या कालावधीत यंदा उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात आतापर्यंत १,३५५ माणसे मरण पावल्याचे दिसून आले. हेच प्रमाण तिथे गेल्या वर्षी १५०३ इतके होते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा