शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आसाममध्ये १.९ कोटी लोक ‘भारतीय’, एनसीआरची पहिली यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:29 IST

बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

गुवाहाटी: बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित लोकांची नावे शहानिशा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत आहेत, भारताचे महानिबंधक शैलेश यांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हा मसुदा प्रकाशित करताना स्पष्ट केले.हा मसुद्याचा एक भाग आहे. यात १.९ कोटी लोकांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरित लोकांबाबत विविध पातळीवर शहानिशा केली जातआहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरदुसरा मसुदा प्रकाशित केलाजाईल, अशी माहिती शैलेश यांनी रविवारी मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.राष्टÑीय नागरिक नोंदणी विभागाचे राज्याचे समन्वयक प्रतीक हजेला यांनी सांगितले की, पहिल्या यादीत ज्यांची नावे नाहीत, अशांनी काळजी करण्याचे कारण नाही. शहानिशा करण्याची प्रक्रिया लांबलचक असल्याने पहिल्या यादीतून अनेकांची नावे समाविष्ट होऊ शकणार नाहीत. तथापि, त्यांनी काळजी करू नये. त्याच्यांशी संबंधित दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे. दुसरी यादी कधी जारी करणार? असे विचारले असता हजेल यांनीसांगितले की, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात एप्रिलमध्ये होणाºया पुढल्या सुनावणीच्यावेळी केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे.ही संपूर्ण प्रक्रिया २०१८ मध्येच पूर्ण केली जाईल, असे महानिबंधक शैलेश यांनी यावेळी स्पष्ट केले. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मे २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. यातहत आसाममधील ६८.२७ लाख कुटुंबियांकडून ६.५ कोटी दस्तावेज प्राप्त झाली होते.बांगलादेशींवर उपायएनआरसी असलेले आसाम हे एकमेव राज्य आहे. १९५१ मध्ये एनआरसी तयार करण्यात आली होती. विसाव्या शतकापासून आसाममध्ये बांगलादेशातून लोकांचे लोंढे येत आहेत, त्यावर हा उपाय मानला जात आहे.

टॅग्स :IndiaभारतAssamआसाम