शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

आसाममध्ये १.९ कोटी लोक ‘भारतीय’, एनसीआरची पहिली यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:29 IST

बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

गुवाहाटी: बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित लोकांची नावे शहानिशा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत आहेत, भारताचे महानिबंधक शैलेश यांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हा मसुदा प्रकाशित करताना स्पष्ट केले.हा मसुद्याचा एक भाग आहे. यात १.९ कोटी लोकांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरित लोकांबाबत विविध पातळीवर शहानिशा केली जातआहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरदुसरा मसुदा प्रकाशित केलाजाईल, अशी माहिती शैलेश यांनी रविवारी मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.राष्टÑीय नागरिक नोंदणी विभागाचे राज्याचे समन्वयक प्रतीक हजेला यांनी सांगितले की, पहिल्या यादीत ज्यांची नावे नाहीत, अशांनी काळजी करण्याचे कारण नाही. शहानिशा करण्याची प्रक्रिया लांबलचक असल्याने पहिल्या यादीतून अनेकांची नावे समाविष्ट होऊ शकणार नाहीत. तथापि, त्यांनी काळजी करू नये. त्याच्यांशी संबंधित दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे. दुसरी यादी कधी जारी करणार? असे विचारले असता हजेल यांनीसांगितले की, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात एप्रिलमध्ये होणाºया पुढल्या सुनावणीच्यावेळी केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे.ही संपूर्ण प्रक्रिया २०१८ मध्येच पूर्ण केली जाईल, असे महानिबंधक शैलेश यांनी यावेळी स्पष्ट केले. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मे २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. यातहत आसाममधील ६८.२७ लाख कुटुंबियांकडून ६.५ कोटी दस्तावेज प्राप्त झाली होते.बांगलादेशींवर उपायएनआरसी असलेले आसाम हे एकमेव राज्य आहे. १९५१ मध्ये एनआरसी तयार करण्यात आली होती. विसाव्या शतकापासून आसाममध्ये बांगलादेशातून लोकांचे लोंढे येत आहेत, त्यावर हा उपाय मानला जात आहे.

टॅग्स :IndiaभारतAssamआसाम