शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

'आयुष्यमान भारत' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस; गुजरातमध्ये एकाच कुटुबांला दिले १७०० आरोग्य कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:07 IST

आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत बनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीसबनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचं समोर येत आहे. या योजनेतंर्गत २ लाखांहून अधिक बनावट कार्ड बनविण्यात आल्याचं उघड झालं आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार गुजरातमध्ये एकाच कुटुंबात तब्बल १७०० आयुष्यमान भारत कार्ड आढळून आले आहेत. तर छत्तीसगडमध्ये एका कुटुंबातील ५७ जणांना या योजनेतून डोळ्यांची सर्जरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. सध्या हे प्रकरण पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पोहचले आहे. 

बनावट कार्ड बनविण्याचे सर्वाधिक प्रकार उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड आणि झारखंडमधून समोर आलेत. सध्या देशभरात २ लाखांपेक्षा अधिक आयुष्यमान भारत योजनेची बनावट कार्ड असल्याचं उघड झालं आहे. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. ज्याचा खर्च सरकारकडून केला जातो. 

आयुष्यमान भारत योजनेतील बनावट कार्डाचे प्रकार समोर आलेत. यात गुजरातमधील एका हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्राने एकाच कुटुंबाच्या नावावर १७०० बनावट कार्ड बनविले आहेत. छत्तीसगडच्या एएसजी रुग्णालयात एका कुटुंबाच्या नावावर १०९ बनावट कार्ड असल्याचं उघड झालं. यामधील ५७ जणांनी उपचाराचा फायदाही करुन घेतला आहे. पंजाबमध्ये दोन कुटुबांच्या नावावर २०० कार्ड बनविण्यात आलेत. तर मध्यप्रदेशात एका कुटुबांच्या नावावर ३२२ बनावट कार्ड छापण्यात आले आहेत. 

आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत बनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकोटच्या एका सरकारी शाळेत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यात अनेकांना बनावट कार्ड वाटप करण्यात आलं, प्रत्येक व्यक्तीकडून ७०० रुपये शुल्क घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीच्या आधारे राजकोटच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष जैमीन ठकर यांनी घटनास्थळावर छापा टाकत पोलिसांना माहिती दिली. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. या योजनेतून आजतागायत ७० लाख लोकांनी उपचार घेतले आहेत. त्यासाठी सरकारने ४ हजार ५९२ कोटी रुपये खर्च केले आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्यGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र