शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'आयुष्यमान भारत' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस; गुजरातमध्ये एकाच कुटुबांला दिले १७०० आरोग्य कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:07 IST

आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत बनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीसबनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचं समोर येत आहे. या योजनेतंर्गत २ लाखांहून अधिक बनावट कार्ड बनविण्यात आल्याचं उघड झालं आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार गुजरातमध्ये एकाच कुटुंबात तब्बल १७०० आयुष्यमान भारत कार्ड आढळून आले आहेत. तर छत्तीसगडमध्ये एका कुटुंबातील ५७ जणांना या योजनेतून डोळ्यांची सर्जरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. सध्या हे प्रकरण पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पोहचले आहे. 

बनावट कार्ड बनविण्याचे सर्वाधिक प्रकार उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड आणि झारखंडमधून समोर आलेत. सध्या देशभरात २ लाखांपेक्षा अधिक आयुष्यमान भारत योजनेची बनावट कार्ड असल्याचं उघड झालं आहे. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. ज्याचा खर्च सरकारकडून केला जातो. 

आयुष्यमान भारत योजनेतील बनावट कार्डाचे प्रकार समोर आलेत. यात गुजरातमधील एका हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्राने एकाच कुटुंबाच्या नावावर १७०० बनावट कार्ड बनविले आहेत. छत्तीसगडच्या एएसजी रुग्णालयात एका कुटुंबाच्या नावावर १०९ बनावट कार्ड असल्याचं उघड झालं. यामधील ५७ जणांनी उपचाराचा फायदाही करुन घेतला आहे. पंजाबमध्ये दोन कुटुबांच्या नावावर २०० कार्ड बनविण्यात आलेत. तर मध्यप्रदेशात एका कुटुबांच्या नावावर ३२२ बनावट कार्ड छापण्यात आले आहेत. 

आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत बनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकोटच्या एका सरकारी शाळेत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यात अनेकांना बनावट कार्ड वाटप करण्यात आलं, प्रत्येक व्यक्तीकडून ७०० रुपये शुल्क घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीच्या आधारे राजकोटच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष जैमीन ठकर यांनी घटनास्थळावर छापा टाकत पोलिसांना माहिती दिली. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. या योजनेतून आजतागायत ७० लाख लोकांनी उपचार घेतले आहेत. त्यासाठी सरकारने ४ हजार ५९२ कोटी रुपये खर्च केले आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्यGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र