१७... सारांश
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:44+5:302014-12-18T00:40:44+5:30
हत्तीरोग प्रतिबंधक मोहिमेला सुरुवात

१७... सारांश
ह ्तीरोग प्रतिबंधक मोहिमेला सुरुवातकाटोल : तालुक्यात हत्तीरोग प्रतिबंधक मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यात नागरिकांना डी.ई.सी. अलबेंडाझोलच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. या गोळ्या घेण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती लीला चौरे, रमेश सरवरे, प्रशांत वीरखरे, अशोक हेडाऊ आदींनी केले आहे. ***खात गणातील मतदारयादी प्रसिद्ध मौदा : खात पंचायत समिती गणातील मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. यावर गुरुवारपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येईल. बुधवारी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवराज पडोळे यांनी केले आहे.***महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणीकन्हान : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७ चे डांबरीकरण सुरू आहे. हा मार्ग कन्हान ते टेकाडीपर्यंत अरुंद असल्याने तसेच दुभाजक नसल्याने अपघात होतात. त्यामुळे या मार्गाचे येथे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवकुमार यादव यांनी केली आहे.***कन्हान येथे नेत्र तपासणी शिबिरकन्हान : स्थानिक युवा मंच व जीवन मुंडले मित्र परिवाराच्यावतीने हनुमान मंदिरात नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यात परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून गरिबांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. काहींची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.***पोलीस पाटलांचे मानधन वाढवापारशिवनी : हल्ली पोलीस पाटलांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांना मिळणारे मानधन तोकडे असल्याने त्यांचे मानधन प्रति माह तीन हजार रुपये करावे, अशी मागणी विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघाचे अध्यक्ष दीपक पालीवाल यांनी केली आहे.***बसची मागणीनांदागोमुख : स्थानिक व परिसरातील खापा, नरसाळा, पंढरी, जलालखेडा, रामपुरी येथील विद्यार्थी केळवद येथे शिक्षणाला जातात. सावनेर - नांदागोमुख ही बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.***नांदागोमुख येथे घाणीचे साम्राज्यनांदागोमुख : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केल्याने गावात घाण व कचरा साचल्याचे दिसून येते. नाल्यांची योग्य साफसफाई करण्यात न आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे घाण व कचरा साफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ***