शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

१७ पर्यटनस्थळांमध्ये अजिंठा, वेरूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:27 IST

अर्थमंत्र्यांची घोषणा। संपूर्ण परिसराचा होणार विकास

नवी दिल्ली : देशातील ज्या महत्त्वाच्या १७ पर्यटनस्थळांना विकसित करून, जागतिक दर्जा देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केली, त्यात महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांचा समावेश आहे. जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये टाकण्यासाठी त्यांचा व परिसराचा विकास केला जाणार आहे. या १७ स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात १,३७८ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याखेरीज कर्नाटकातील हम्पी, गोव्यातील कोळवा बीच, राजस्थानातील अजमेरचा किल्ला, बिहारमधील महाबोधी मंदिर यांचाही या १७ ठिकाणांमध्ये समावेश असणार आहे. पर्यटकांमध्येही आताही हीच पर्यटनस्थळे लोकप्रिय आहेत. देश-परदेशांतील पर्यटक यापैकी बहुसंख्य इथे हमखास जातात.

सोमनाथला भाविकांची अधिक गर्दी असते, तर काझीरंगामध्ये वन्यप्राणी पाहण्यासाठीही अनेक पर्यटक जातात. अधिकाधिक पर्यटकांनी जावे, यासाठी तिथे अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. हॉटेल्स, चांगल्या दर्जाची रेस्टॉरंट्स, विविध सरकारी व खासगी वाहने, मार्गदर्शक, रेल्वे व विमानतळांपासून चांगले रस्ते व वाहनव्यवस्था यांचा त्यात समावेश आहे.मात्र, अनेकांना या पर्यटनस्थळांची माहिती नसल्याने पर्यटन मंडळातर्फे देश-विदेशांत ती देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक पर्यटनस्थळाची स्वतंत्र वेबसाइट असेल आणि त्यात तिथे पोहोचण्यापासून, राहणे व खाण्याची सर्व माहिती असेल. नेमण्यात येणाऱ्या मार्गदर्शकांची माहितीही त्यात दिली जाईल. परदेशांतील दूतावासांमध्येही या स्थळांची माहिती मिळू शकेल.निर्मला सीतारामन यांनी १७ ठिकाणांचा उल्लेख केला होता, पण त्या ठिकाणांची नावे मात्र त्यांच्या भाषणात नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, या १७ ठिकाणांमध्ये आग्रा येथील ताजमहाल व फतेपूर सिक्रीचा किल्ला, दिल्लीतील कुतुबमिनार, हुमायूंची कबर, लाल किल्ला, गुजरातमधील सोमनाथ व ढोलवीरा, खजुराओ (मध्य प्रदेश), महाबलीपूरम (तामिळनाडू), कुमारकोम (केरळ), काझीरंगा (आसाम) यांचाही समावेश करण्यात आला आहे.अजिंठा लेणी इ.स. पूर्व दुसरे ते इ. स. चौथे अशा कालखंडात तयार केल्या आहेत. त्यात एकूण २९ बौद्ध लेणी आहेत.पाचव्या ते दहाव्या शतकात कोरलेल्या वेरूळ लेणी आहेत. कैलाश मंदिराची निर्मिती राष्ट्रकुट राजा कृष्ण याच्या काळात झाली.