शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवी दिल्ली :  प्रद्युम्नसारखंच आणखी एक हत्याकांड, प्रख्यात शाळेच्या बाथरुममध्ये आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 09:14 IST

राजधानी नवी दिल्लीमध्ये गुरुग्रामच्या रेयान स्कूलमधील प्रद्युम्न हत्याकांड सारखं एक प्रकरण समोर आले आहे.

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीमध्ये गुरुग्रामच्या रेयान स्कूलमधील प्रद्युम्न हत्याकांड सारखं एक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील सादतपूर येथील इंटर कॉलेज जीवन ज्योती स्कूलमध्ये 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव तुषार असून तो इयत्ता नववीतील विद्यार्थी होता. तुषारचा मृतदेह शाळेतील बाथरुममध्ये संशयास्पदरित्या आढळला. तुषार आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे प्रकरण प्रद्युम्न हत्याकांड प्रमाणे असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.  प्रद्युम्न हत्याकांडप्रमाणेच तुषारचाही मृतदेह बाथरुममध्ये आढळून आला आहे. सकाळच्या सुमारास शाळेत होणा-या प्रार्थनेच्या वेळेदरम्यान त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

तुषारच्या नातेवाईकांनी सांगितले की, तुषार नेहमीप्रमाणे गुरुवारीदेखील सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शाळेसाठी जाण्यास घराबाहेर पडला. यानंतर तुषार अचानक बेशुद्ध पडल्याची माहिती शाळेतून त्याच्या घरातल्यांना देण्यात आली. सुरुवातीला तुषारला जवळील मावी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेथून पुढे त्याला जीटीबी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तुषारचा मृत्यू झाला होता.  जीटीबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तुषारच्या मृत्यूमुळे संतापलेल्या त्याच्या नातेवाईकांना शाळेला घेराव घातला. ''शाळा प्रशासनानं तुषारच्या मृत्यूचं सत्य लपवून ठेवलं, कारण त्याचा मृत्यू शाळेतच झाला होता'', असा आरोप नातेवाईकांना केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तुषारचा मृतदेह शाळेतील बाथरुममध्ये संशयास्पदरित्या आढळून आला. मात्र, त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळलेल्या नाहीत.  या प्रकरणाची सखोल चौकशी करत असल्याचंही पोलिसांनी सांगितले आहे.  

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूNew Delhiनवी दिल्ली