शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

देशात किती लोक दारू पितात माहित्येय?... पेताडांचा आकडा पाहून व्हाल तर्रर्रर्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 10:57 IST

बदललेली लाइफस्टाईल, वाढलेल्या पार्ट्या अन् वाढलेली दारूची दुकाने पाहून ढोबळ मानाने दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असं बघायला मिळतं. पण देशातील नेमके किती लोक दारू पितात हे फारसं कुणाला माहीत नसावं.

(Image Credit : yourdrugtesting.com)

नवी दिल्ली : बदललेली लाइफस्टाईल, वाढलेल्या पार्ट्या अन् वाढलेली दारूची दुकाने पाहून ढोबळ मानाने दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असं बघायला मिळतं. पण देशातील नेमके किती लोक दारू पितात हे फारसं कुणाला माहीत नसावं. मात्र आता देशातील किती लोक दारू पितात याची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. 

सरकारने गुरूवारी याबाबतची माहिती राज्यसभेत दिली. या आकडेवारीनुसार, देशातील तब्बल १६ कोटी लोक दारू पितात, तर यातील साधारण ६ कोटी लोकांना याची सवय आहे. इतकेच नाही तर साधारण ३.१ कोटी लोक भांग असलेल्या उत्पादनांचं सेवन करतात. 

काय म्हणाले मंत्री?

(Image Credit : livescience.com)

सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी राज्यसभेत देशातील वेगवेगळ्या भागातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या नशेच्या सवयीची माहिती देताना वरील आकडेवारी दिली. त्यांनी सांगितले की, मंत्रालयाने २०१८ मध्ये देशात अशाप्रकारचा केलेला हा पहिलाच सर्व्हे आहे. या सर्व्हेची जबाबदारी नॅशनल ड्रग डिपेंडेंस सेंटर, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) यांना देण्यात आली होती. 

(Image Credit : CariFree)

त्यांनी सांगितले की, देशातील सर्वच ३६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये २ लाख १११ परिवारांना भेटून नशेच्या पदार्थांच्या वापराची सीमा आणि पद्धतीबाबत चार लाख ७३ हजार ५६९ लोकांना प्रश्न विचारण्यातआलेत. या सर्व्हेमधून ही बाब समोर आली की, १६ कोटी लोक अल्कोहोलचं सेवन करतात. ३.१ कोटी लोक भांगपासून तयार उत्पादनांचं सेवन करतात. सोबतच २.२६ कोटी लोक अफूचं सेवन करतात.

वेगवेगळ्या प्रकारची नशा करतात लोक

(Image Credit : Oregon Cannabis Connection)

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, यावेळी १० ते ७५ वयोगटातील जवळपास १.१८ कोटी लोक सीडेटिव्स(चिकित्सा नसलेले सल्ले)चा वापर करतात. तर ७७ लाख लोक इनहेलेंट्सचा वापर करतात. त्यांनी सांगितले की, नशेच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये इनहेलेंट्सच अशी श्रेणी आहे, जी लहान मुलांमध्ये आणि किशोरांमध्ये यावेळी जास्त लोकप्रिय आहे. आणि यांचा वापर ते अधिक करतात. 

१० शहरात शाळा-कॉलेजमधील मुलांवर होत आहे सर्व्हे

गहलोत यांनी सांगितले की, 'मला हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की, देशातील १० मोठी शहरं जसे की, श्रीनगर, लखनौ, रांची, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, इंफाल, डिब्रूगढ आणि दिल्लीमध्ये शाळा-कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नशेच्या पदार्थांच्या वापराबाबत सर्व्हेक्षण केलं जात आहे. हा रिपोर्ट नोव्हेंबर २०१९ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे'.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाNew Delhiनवी दिल्लीlok sabhaलोकसभा