शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

उत्तरप्रदेशातील वादळात १६ बळी, २७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:52 IST

उत्तर प्रदेशच्या काही भागांना बुधवारी रात्री वादळ व मुसळधार पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या १६ वर पोहोचली असून, २७ जण जखमी झाले आहेत. राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशच्या काही भागांना बुधवारी रात्री वादळ व मुसळधार पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या १६ वर पोहोचली असून, २७ जण जखमी झाले आहेत. राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.इटावा येथे रात्री चार, मथुरा व अलिगढ येथे प्रत्येकी तीन, फिरोझाबाद व आग्रा येथे प्रत्येकी दोन तर हाथरस व कानपूर येथे प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. बुधवारच्या वादळतांडवात सात घरे कोसळली असून, ३७ गुरे मरण पावली आहेत. वादळ व पावसाचा तडाखा उत्तरप्रदेशातील नऊ जिल्ह्यांना बसला आहे. गेल्या आठवड्यातील वादळाचाही फटका याच जिल्ह्यांना बसला होता. धुळीचे वादळ व मुसळधार पावसामुळे पाच राज्यांत १३४ जणांचा बळी गेला व ४००हून अधिक जण जखमी झाले होते.या वादळात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई उत्तरप्रदेश सरकार देणार आहे. वादळामुळे नुकसान झालेल्या मथुरातील काही ठिकाणांना उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली.मुख्यमंत्र्यांचे आदेशशनिवारी व रविवारी उत्तरप्रदेशच्या पूर्व भागामध्ये ताशी ७० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.वादळग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याची गती वाढविण्याचे तसेच नुकसान झालेल्या भागांना मंत्री तसेच जिल्हाधिकाºयांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, असे आदेश योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊस