16 भारतीयांची सुटका
By Admin | Updated: June 21, 2014 02:03 IST2014-06-21T02:03:54+5:302014-06-21T02:03:54+5:30
मोसूल शहरातून अपहरण करण्यात आलेल्या 4क् भारतीय कामगारांपैकी एकजण अपहरणकत्र्याच्या ताब्यातून निसटला आहे.

16 भारतीयांची सुटका
>इराकमधील अराजक : सुन्नी बंडखोरांच्या ताब्यातून एकजण निसटला
नवी दिल्ली : इराकमधील संघर्षरत भागात अडकलेल्या भारतीयांपैकी 16 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून, मोसूल शहरातून अपहरण करण्यात आलेल्या 4क् भारतीय कामगारांपैकी एकजण अपहरणकत्र्याच्या ताब्यातून निसटला आहे. मोसूल हे शहर बंडखोरांच्या ताब्यात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराकमधील परिस्थितीचा आढावा एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. या बैठकीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथसिंग, सुरक्षा सल्लागार अजित डोवल, कॅबिनेट सचिव अजित सेठ, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग, गुप्तचर व सुरक्षा संस्थांचे प्रमुख यांची उपस्थिती होती. परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात सांगितले की, इराकमधील परिस्थितीबद्दल सरकारला मिळालेल्या माहितीचा सर्व बाजूंनी या बैठकीत आढावा घेण्यात आला.
मोसूल शहरातून अपहरण करण्यात आलेल्या 4क् भारतीय कामगारांपैकी एकजण ताब्यातून निसटला असून, त्याने बगदादमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे, असेही त्यांनी सांगितले. या 4क् भारतीय कामगारांना सुन्नी दहशतवादी गट आयएसआयएसने मोसूल शहरातून पळविले होते. अपहरण करण्यात आलेले भारतीय सुरक्षित असून, त्यांची सुटका करण्याचे सर्व प्रय} चालू आहेत असे अकबरुद्दीन यांनी सांगितले. त्यांच्या सुटकेसाठी बंडखोरांशी वाटाघाटी करणार काय असे विचारले असता, अकबरुद्दीन म्हणाले, आम्ही सर्व दरवाजे ठोठावत आहोत. आठ भारतीयांची संघर्ष चाललेल्या बैजी शहरातून सुटका करण्यात आली असून, आणखी आठजणांना अन्बर येथून बाहेर काढले आहे. या सर्वाना बगदाद येथे आणले आहे.
सरकार इराकमधील भारतीयांना परत आणणार आहे काय? असे विचारले असता अकबरुद्दीन म्हणाले, आपल्या नागरिकांचे जीव धोक्यात असतील तर कोणताही पर्याय बाकी ठेवला जाणार नाही. इराकमध्ये अडकलेल्या व आर्थिक अडचणीमुळे भारतात परतू न शकणा:या भारतीयांना सरकारकडून मदत केली जाईल.
इराकच्या शेजारी देशातील भारतीय दूतावासांनाही इराकमधून बाहेर पडणा:या भारतीय नागरिकांना मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भारतीयांपैकी काहीजणांचे पासपोर्ट त्यांच्या मालकांच्या ताब्यात असल्याने त्यांना व्हिसा देण्याचाही मुद्दा चर्चेत आहे. 12क् भारतीय संघर्ष चाललेल्या भागात अडकले असून, त्यात तिक्रीतमधील 46 नर्स, अपहरण झालेले 4क् कामगार यांचा समावेश आहे. अंबर व बैजी येथून 16 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अपहरण झालेले भारतीय सुरक्षित असल्याचे संकेत मिळालेल्या माहितीवरून काढण्यात आले आहेत. तिक्रीत हे शहरही बंडखोरांच्या ताब्यात आहे. तिथे 46 भारतीय नर्स आहेत, त्यांच्याशीही संपर्क झाला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमध्ये सैनिक तैनात करण्यास नकार दिला आहे; पण त्याचवेळी अमेरिका 3क्क् लष्करी सल्लागार पाठविणार असून, इराकी सैन्याचे मनोबल वाढविण्याचे काम हे सल्लागार करतील.
4इराकमध्ये सरकारविरोधात लढणा:या बंडखोरांचा अभ्यास अमेरिका करत असून, तशी गुप्तचर माहिती गोळा केली जात आहे. या संघर्षाची स्थिती चिघळल्यास लक्ष्याचा वेध घेणारी लष्करी कारवाई अमेरिका करणार आहे. ओबामा यांनी इराकचे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्याबद्दल फारसे वक्तव्य केले नाही.
4शिया नेते असणारे मलिकी यांच्या पंथवादी धोरणामुळेच सध्याचा सुन्नी विरुद्ध शिया हा संघर्ष उभा राहिला आहे. इराकमधील संयुक्त सरकारचे नेतृत्व मलिकी करू शकत नाहीत, असा निष्कर्ष अमेरिकी अधिकारी काढत आहेत.
4इराकचा नेता निवडणो हे आमचे काम नाही, असे ओबामा यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे. सध्या संशय व अविश्वासाचे वातावरण असून, इराकी सरकारने सुन्नी अल्पसंख्याकांना एकाकी पाडले व त्याचे परिणाम आज इराक भोगत आहे, असे ओबामा म्हणाले. मलिकी यांना आपण हा संदेश जाहीरपणो दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
इराकच्या संघर्षातून राजकीय तोडगा निघू शकतो असा आपला विश्वास आहे, असे ओबामा यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी या आठवडय़ात युरोप व मध्यपूव्रेत जात असून, इराकच्या शेजारी देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रय} करतील.
इराणचीही इराकला मदत होऊ शकते; पण इराणही शिया पंथाचा असून इराणने आपले सैन्य इराकमध्ये पाठविल्यास इराकचा विनाश होऊ शकतो, असे ओबामा यांनी म्हटले आहे. इराकमध्ये नागरी युद्ध भडकू नये हे अमेरिकेसाठीही हिताचे आहे. इराक हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनल्यास अमेरिकेवरही हल्ला होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
सोनिया गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र
4इराकमधील अपहृत भारतीयांबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांच्या सुखरुप मुक्ततेबाबत राजनैतिक स्तरावर जोरदार प्रयत्न करावेत, अशी विनंती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. यासंदर्भात सोनिया गांधी यांनी मोदींना एक पत्र पाठविले आहे. या भागातील भारतीयांना तातडीने सुरक्षितपणो मायदेशी परत आणण्याची आवश्यकता आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असे त्यांनी या पत्रत म्हटले आहे.