शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 14:44 IST

Pulwama Attack: पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती.

पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. पाच वर्षांनंतरही या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला मौलाना मसूद अझहर हा भारताच्या ताब्यात येऊ शकलेला नाही. मात्र मागच्या पाच वर्षांत या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या १९ पैकी १५ दहशतवाद्यांना पकडण्यात किंवा ठार मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. मात्र या हल्ल्यातील मुख्य आरोपी मौलाना मसूद अझहरसोबत चार दहशतवादी अद्याप भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. 

पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ रौफ अझगर आणि नातेवाईक अम्मार अलवी हे अद्याप मोकाट आहेत. हे तिघेही पाकिस्तानी नागरिक असून, त्यांना २०१९-२१ दरम्यान दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.  तर या हल्ल्यात सहभागी असलेला चौथा दहशतवादी मोहम्मद इस्माइल हा फरार आहे. 

१४ फेब्रवारी २०१९ रोजी या दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यामधील एका बसला आत्मघाती हल्ला करून लक्ष्य केले होते. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता.  

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार अझगर याने पुलवामा हल्ल्यानंतर आणखी एका हल्ल्याची आखणी केली होती. मात्र बालाकोटमधील एअरस्ट्राइक आणि फारुख याच्या हत्येनंतर अझगर याने ती योजना टाळली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे घुसून एअरस्ट्राईल केली होती. तसेच शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत