शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 14:44 IST

Pulwama Attack: पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती.

पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. पाच वर्षांनंतरही या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला मौलाना मसूद अझहर हा भारताच्या ताब्यात येऊ शकलेला नाही. मात्र मागच्या पाच वर्षांत या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या १९ पैकी १५ दहशतवाद्यांना पकडण्यात किंवा ठार मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. मात्र या हल्ल्यातील मुख्य आरोपी मौलाना मसूद अझहरसोबत चार दहशतवादी अद्याप भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. 

पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ रौफ अझगर आणि नातेवाईक अम्मार अलवी हे अद्याप मोकाट आहेत. हे तिघेही पाकिस्तानी नागरिक असून, त्यांना २०१९-२१ दरम्यान दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.  तर या हल्ल्यात सहभागी असलेला चौथा दहशतवादी मोहम्मद इस्माइल हा फरार आहे. 

१४ फेब्रवारी २०१९ रोजी या दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यामधील एका बसला आत्मघाती हल्ला करून लक्ष्य केले होते. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता.  

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार अझगर याने पुलवामा हल्ल्यानंतर आणखी एका हल्ल्याची आखणी केली होती. मात्र बालाकोटमधील एअरस्ट्राइक आणि फारुख याच्या हत्येनंतर अझगर याने ती योजना टाळली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे घुसून एअरस्ट्राईल केली होती. तसेच शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत