शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लॉकडाउन हटविल्यामुळे भारतासह १५ देशांना रुग्णवाढीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 03:43 IST

सुरक्षा संशोधन संस्थेचा निष्कर्ष : ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास; फ्रान्स, इटलीत सुधारणा शक्य

नवी दिल्ली : लॉकडाऊन उठविणाऱ्या भारतासह १५ देश धोक्याच्या उंबरठ्यावर असून तेथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते,असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. जगातील ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास केल्यानंतर ‘नोमुरा’ संस्थेने हा निष्कर्ष काढला आहे. यात सातत्याने रुग्णवाढ होणाºया तसेच नव्या रुग्णांचे प्रमाण कायम बदलत असलेल्या देशांचाही समावेश होता. यानुसार, १७ देशांमध्ये ‘कोविड-१९’ची दुसरी लाट येण्याची शक्यता नसल्याचे आढळले. १३ देशांमधील परिस्थिती सुधारली असली तरी, तेथे पुन्हा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. उर्वरित १५ देशांमध्ये दुसरी लाट येण्याचा सर्वाधिक धोका वर्तवण्यात आला आहे.

लॉकडाऊन हटविणाºया या १५ देशांमध्ये अर्थात भारताचाही समावेश आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नसणाऱ्यांमध्ये फ्रान्स, इटली, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. जर्मनी, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये परिस्थिती सुधारत असून तेथे काही प्रमाणात संसर्ग शक्य आहे. भारतासह इंडोनेशिया, चिली, पाकिस्तान, स्वीडन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, कॅनडा या देशांमध्ये संसर्गाची दुसरी लाट शक्य आहे.बरे होणाºयांची संख्या वाढण्याची चांगली, अथवा दुसरी लाट येण्याची वाईट शक्यताच् पहिली शक्यता : पहिली शक्यता अशी आहे की, अमेरिकेप्रमाणे रुग्ण बरे होणाºयांची संख्या वाढीस लागेल. काही प्रमाणात वा पूर्ण लॉकडाऊन उठविण्याचा परिणाम म्हणून आर्थिक व्यवहार सुरू होतील. या काळात नवे रुग्ण वाढतील. मात्र, त्याची संख्या कमी असेल. यामुळे ‘कोविड-१९’ बद्दलची लोकांच्या मनातील भीती कमी होईल आणि लोकांचे आर्थिक व्यवहार अधिक प्रमाणात वाढतील. काही काळानंतर नवे रुग्ण कमी होत जातील. हा टप्पा लाट ओसरत असल्याचे निदर्शक असेल.च् दुसरी शक्यता : ज्या देशांमध्ये लॉकडाऊन हटविण्यात आले, तेथे रुग्णवाढीचा वेग जास्त असेल. लोक बाहेर पडल्याने व्यवहार वाढतील. मात्र, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण आढळतील. असे झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. यामुळे साहजिकच लोकांच्या बाहेर पडण्यावर आणि पर्यायानेदैनंदिन आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येईल. ही शक्यता वास्तवात उतरल्यास काही देशांमध्ये किंवा देशातीलकाही भागांमध्ये पुन्हालॉकडाऊन जारी केले जाऊ शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत