शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

देशात पावसाचे १४८ बळी, आणखी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 04:43 IST

बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने गत चार ते पाच दिवसांत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली/पाटणा : बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने गत चार ते पाच दिवसांत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १११ बळी उत्तर प्रदेशात गेले आहेत, तर बिहारमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे.पश्चिम मध्यप्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ भागातही जोरदार पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २६ सप्टेंबर रोजी ३६ लोकांचा, २७ रोजी १८ जणांचा आणि २८ रोजी २८ नागरिकांचा मृत्यू झाला. २९ रोजी १८ लोक मृत्युमुखी पडले, तर सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला.बिहारमध्ये चार ते पाच दिवसांपासून पावसाने कहर केला असून, पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून पाटण्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, गया जिल्ह्यात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. भिंत कोसळून पाच जणांचा तर, एक जण नदीत बुडून मृत्युमुखी पडला आहे. जहानाबाद जिल्ह्याजवळ एका तीनवर्षीय मुलीचा भिंत कोसळून मृत्यू झाला. रविवारपर्यंत राज्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत राज्यात ३० जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानाला पाण्याने घेरले आहे. (वृत्तसंस्था)तुरुंगात पाणी ; ९०० कैद्यांचे स्थलांतरणबलिया : उत्तर प्रदेशातील बलियामध्ये गंगा नदीचे पाणी तुरुंगात शिरल्याने ९०० कैद्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या कैद्यांना सुरक्षित स्थलांतरित करण्यासाठी चार उपअधीक्षक, २० एसएचओ, ८० उपनिरीक्षक, १४६ हेड कॉन्स्टेबल आणि ३८० कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तुरुंग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ९०० पैकी ५०० कैद्यांना आझमगडच्या तुरुंगात, तर उर्वरित कैद्यांना आंबेडकरनगरमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.बलियाच्या तुरुंगात बराकीमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे या कैद्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :floodपूरUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार