शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

देशात पावसाचे १४८ बळी, आणखी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 04:43 IST

बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने गत चार ते पाच दिवसांत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली/पाटणा : बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने गत चार ते पाच दिवसांत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १११ बळी उत्तर प्रदेशात गेले आहेत, तर बिहारमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे.पश्चिम मध्यप्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ भागातही जोरदार पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २६ सप्टेंबर रोजी ३६ लोकांचा, २७ रोजी १८ जणांचा आणि २८ रोजी २८ नागरिकांचा मृत्यू झाला. २९ रोजी १८ लोक मृत्युमुखी पडले, तर सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला.बिहारमध्ये चार ते पाच दिवसांपासून पावसाने कहर केला असून, पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून पाटण्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, गया जिल्ह्यात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. भिंत कोसळून पाच जणांचा तर, एक जण नदीत बुडून मृत्युमुखी पडला आहे. जहानाबाद जिल्ह्याजवळ एका तीनवर्षीय मुलीचा भिंत कोसळून मृत्यू झाला. रविवारपर्यंत राज्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत राज्यात ३० जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानाला पाण्याने घेरले आहे. (वृत्तसंस्था)तुरुंगात पाणी ; ९०० कैद्यांचे स्थलांतरणबलिया : उत्तर प्रदेशातील बलियामध्ये गंगा नदीचे पाणी तुरुंगात शिरल्याने ९०० कैद्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या कैद्यांना सुरक्षित स्थलांतरित करण्यासाठी चार उपअधीक्षक, २० एसएचओ, ८० उपनिरीक्षक, १४६ हेड कॉन्स्टेबल आणि ३८० कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तुरुंग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ९०० पैकी ५०० कैद्यांना आझमगडच्या तुरुंगात, तर उर्वरित कैद्यांना आंबेडकरनगरमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.बलियाच्या तुरुंगात बराकीमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे या कैद्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :floodपूरUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार