शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या ४ हजार गावांत भाजपाला १४४ कलम लागू, धरण व बंदराला विरोध, आदिवासी आणि मच्छीमार आक्रमक

By संदीप प्रधान | Updated: December 2, 2017 02:22 IST

पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी...

वलसाड : पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी आदिवासी पट्ट्यातील चाकमांडला या दुर्गम गावात धरणामुळे विस्थापित होणा-या ग्रामस्थांमध्ये आणि उंबरगाव तालुक्यातील नारगोळमध्ये बंदर उभारण्यास मच्छीमारांचा तीव्र विरोध असल्याने भाजपाला विरोध आहे.चाकमांडला गाव धरमपूर विधानसभा मतदारसंघातील. या आदिवासीबहुल मतदारसंघावर वर्षानुवर्षे काँग्रेसचे वर्चस्व आहे, तर उंबरगावमधून भाजपाचे रमण पाटकर तब्बल नववी निवडणूक लढत आहेत आणि बंदराला विरोध सुरू असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.मेहसाणा, राजकोट, सूरत व नवसारी येथील ४ हजार गावांमध्ये भाजपा उमेदवारांना व कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी करणारे फलक लावण्यात आल्याने सत्ताधारी पक्षाचे धाबे दणाणले आहे. पाटीदार समाजाच्या या विरोधाची चर्चा सर्वदूर पसरली आणि वलसाड, सूरतसारख्या शहरी भागांतील नाराज मतदारांनी वॉर्डांमध्ये आणि सोसायट्यांमध्येही भाजपासह सर्वच पक्षांना १४४ कलम लागू केले. राजकीय पक्षाचे उमेदवार व नेत्यांनी शहरी मतदारांच्या नाकदुºया काढून काही ठिकाणी हे फलक काढून टाकायला लावले.पाटीदार समाजातील रोषाला निमित्त ठरला, तो तलाठ्यांच्या भरतीमधील दोन वर्षांपूर्वीचा घोटाळा. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ््याच्या धर्तीवर गुजरातमध्ये एक लाख रुपये घेऊन झालेली तलाठ्यांची भरती उच्च न्यायालयाने रद्द केली. तेथेच पाटीदारांच्या आंदोलनाची ठिणगी पडली. वलसाडमधील आदिवासीबहुल भागातील बोपी, वास्ता, धरमपूर व चाकमांडला गावे महाराष्ट्राच्या सीमेलगत आहेत. धरणबांधणीमुळे चाकमांडला विस्थापित होण्याची भीती आदिवासींना आहे. बोपीतील आदिवासी ग्रामस्थ म्हणाले की, तिकडे जाऊन पाण्याची समस्या आहे का? धरणाची गरज आहे का? असे सवाल करू नका. लोक संतापून अंगावर धावून येतात.रस्त्यावर बॅरिकेड्सया गावांकडे जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड्स टाकले होते. निमलष्करी दलाचे जवान व स्थानिक पोलीस पुढे आले. कुठून आलात? या गावात का जायचे आहे? अशा असंख्य प्रश्नांची सरबत्ती केली.ओळखपत्र निरखून पाहिले. ईश्वरलाल पटेल नावाचा पोलीस अधिकारी बॅगा तपासताना पोलीस शिपायांना दारू, कॅश, हत्यार, बॉम्ब आहे का बघा, म्हणून सूचना करीत होता, त्यामुळे मोठी गंमत वाटली.महाराष्ट्राच्या सीमेलगत ही गावे असल्याने दारू, पैसे, शस्त्रे गुजरातमध्ये येऊ शकतात. त्यामुळे आम्ही सतर्क असल्याचे या पोलीस अधिकाºयाने सांगितले.उंबरगाव तालुक्यातील नारगोळमध्ये बंदर प्रकल्पाला तेथील मच्छीमारांचा विरोध आहे. हे बंदर उभे राहणार, हे निश्चित. मात्र, त्यामुळे उंबरगावमधील भाजपाचे उमेदवार रमण पाटकर यांची डोकेदुखी वाढली आहे. पाटकर यांनी आतापर्यंत आठ निवडणुका लढविल्या असून, ही त्यांची नववी निवडणूक आहे. त्यापैकी चार निवडणुकात ते विजयी झाले. जनता दलापासून वेगवेगळ््या पक्षांद्वारे त्यांनी निवडणूक लढविली होती.धरणाचा अट्टाहास कशाला? : चाकमांडला गावाला भेट दिली, तेव्हा लोकांमध्ये धरणाबाबत कमालीची भीती असल्याचे जाणवले. जमिनीत व नदीला पुरेसे पाणी असताना धरणाचा अट्टाहास कशाला, असा सवाल आदिवासींनी केला. धरमपूरपासून दहा किलोमीटर अंतरावरील खडकाळ रस्त्यावर ही गावे आहेत. घनदाट झाडी आणि कच्चा रस्ता पक्का करण्याची सुरू असलेली कामे हेच दृश्य दिसते.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातBJPभाजपा