शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

तारीख पे तारीख! कोर्टात 60 वर्षांपासून प्रलंबित आहेत 140 खटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 10:02 IST

न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे, असे म्हटले जाते. मात्र भारतातील विविध न्यायालयांमध्ये अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत.

ठळक मुद्दे भारतातील विविध न्यायालयांमध्ये अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेतदेशातील विविध कनिष्ठ न्यायालयांमध्ये सुमारे 140 खटले हे तब्बल 60 वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहेसध्या देशातील प्रलंबित खटल्यांची संख्या 2.9 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यापैकी 71 टक्के फौजदारी खटले आहेतप्रलंबित खटल्यांमध्ये सर्वाधिक खटले उत्तर प्रदेशमधील, त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर

नवी दिल्ली - न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे, असे म्हटले जाते. मात्र भारतातील विविध न्यायालयांमध्ये अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले खटले ही भारतीय न्यायव्यवस्थेसमोरील गंभीर आव्हान बनले आहे.  दरम्यान, न्यायाच्या अपेक्षेने न्यायालयात धाव घेणाऱ्या सर्वसामान्यांना कित्येक वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते, याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. देशातील विविध कनिष्ठ न्यायालयांमध्ये सुमारे 140 खटले हे तब्बल 60 वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच जिल्हा आणि इतर न्यायालयांमध्ये सुमारे 66 हजार खटले हे 30 किंवा अधिक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तर सुमारे 60 लाख खटले हे पाच वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहेत.  बक्सर येथील राहुल पाठक यांचा खटला प्रलंबित खटल्यांचे एक उदाहरण आहे.  दरम्यान, सरकारने हल्लीच केलेल्या अभ्यासानुसार सध्या न्यायालयात प्रलंबित असलेले खटले ज्या प्रकारे निकाली काढण्यात येत आहेत. त्यांचा वेग पाहता सर्व खटले निकाली काढण्यासाठी सुमारे 324 वर्षे लागतील.  सध्या देशातील प्रलंबित खटल्यांची संख्या 2.9 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यापैकी 71 टक्के फौजदारी खटले असून, यातील बहुतांश आरोपी सध्या अंडर ट्रायल आहेत.  न्यायालयामध्ये दर महिन्याला लाखो खटले दाखल होत असून, गेल्या महिन्यातच सुमारे 10.2 लाख खटले न्यायालयासमोर आले आहेत. त्यापैकी केवळ 8 लाख खटले निकाली निघाले असून, 2.2 लाख खटले प्रलंबित झाले आहेत. प्रलंबित खटल्यांमध्ये सर्वाधिक खटले उत्तर प्रदेशमधील असून,  येथे सुमारे 26 हजार खटले प्रलंबित आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागत असून, महाराष्ट्रामधील 13 हजार खटले प्रलंबित आहेत. तसेच एकूण प्रलंबित खटल्यांपैकी 96 टक्के खटले हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात आणि ओदिशा या राज्यातील आहेत.  

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत