शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 15:16 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आता 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. मणिपूर ते मुंबई असा यात्रेचा मार्ग असेल.

Bharat Jodo Yatra: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेसदेखील गुरुवारी नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत. तसेच, पुढील महिन्यापासून राहुल गांधी भारत जोड यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यावर रवाना होत आहेत. राहुल गांधी 14 जानेवारीला मणिपूरपासून यात्रा सुरू करतील तर  20 मार्चला मुंबईत यात्रेचा समारोप होईल. 

गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर, असा सुमारे 3900 किलोमीटरचा प्रवास केला होता. काँग्रेसने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदयात्रा काढली होती. राहुल यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये संपली. यादरम्यान, राहुल गांधींनी 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रवास केला. या दौऱ्याचा दक्षिण भारतात काँग्रेसला राजकीय फायदा झाला.

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'नंतर आता काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. यादरम्यान, मणिपूर ते मुंबई 6200 किलोमीटरचा प्रवास 67 दिवसांत करणार आहेत. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व-पश्चिम, असा 14 राज्यांमधील लोकसभेच्या 355 जागा जिंकण्यावर काँग्रेसचा फोकस आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या यात्रेद्वारे राहुल गांधी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला राजकीय जीवदान देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या राज्यातून जाणारराहुल गांधीची यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. जयराम रमेश म्हणाले की, भारत जोड यात्रेदरम्यान राहुल गांधींनी आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही, हे तीन मुद्दे उपस्थित केले होते. यावेळी भारत न्याय यात्रेत आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय असेल.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा