शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 15:16 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आता 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. मणिपूर ते मुंबई असा यात्रेचा मार्ग असेल.

Bharat Jodo Yatra: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेसदेखील गुरुवारी नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत. तसेच, पुढील महिन्यापासून राहुल गांधी भारत जोड यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यावर रवाना होत आहेत. राहुल गांधी 14 जानेवारीला मणिपूरपासून यात्रा सुरू करतील तर  20 मार्चला मुंबईत यात्रेचा समारोप होईल. 

गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर, असा सुमारे 3900 किलोमीटरचा प्रवास केला होता. काँग्रेसने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदयात्रा काढली होती. राहुल यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये संपली. यादरम्यान, राहुल गांधींनी 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रवास केला. या दौऱ्याचा दक्षिण भारतात काँग्रेसला राजकीय फायदा झाला.

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'नंतर आता काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. यादरम्यान, मणिपूर ते मुंबई 6200 किलोमीटरचा प्रवास 67 दिवसांत करणार आहेत. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व-पश्चिम, असा 14 राज्यांमधील लोकसभेच्या 355 जागा जिंकण्यावर काँग्रेसचा फोकस आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या यात्रेद्वारे राहुल गांधी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला राजकीय जीवदान देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या राज्यातून जाणारराहुल गांधीची यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. जयराम रमेश म्हणाले की, भारत जोड यात्रेदरम्यान राहुल गांधींनी आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही, हे तीन मुद्दे उपस्थित केले होते. यावेळी भारत न्याय यात्रेत आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय असेल.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा