शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

गुजरात अन् मध्य प्रदेशातही 12 वीची परीक्षा रद्द, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:41 IST

देशातील काही राज्यांनी ही परीक्षा घेण्यास विरोध केला होता. झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामीळनाडू सरकारने परीक्षेआधी मुलांना लस देण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्देगुजरात सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 1 जुलैपासून या परीक्षा होणार होत्या. मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारनेही बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 

अहमदाबाद - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असल्याचे सांगत परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर, आता गुजरात सरकारनेही 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती शिक्षणमंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी दिली. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.  तर, मध्य प्रदेशमध्येही 12 वीची परीक्षा होणार नसल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोरोनाच्या कठीण प्रसंगात विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण देणे उचित ठरणार नाही. परंतु १२ वीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्या आधारे घेतला जाईल, असे पंतप्रधानांनी मंगळवारी सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष, शिक्षण मंत्रालयाचे सचिव यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, राजनाथ सिंह आणि प्रकाश जावडेकर हेही उपस्थित होते. 

देशातील काही राज्यांनी ही परीक्षा घेण्यास विरोध केला होता. झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामीळनाडू सरकारने परीक्षेआधी मुलांना लस देण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात, आसाम, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच ओडिशा आदी या राज्यांनी केवळ मुख्य विषयाची परीक्षा घेऊन परीक्षेचा वेळ कमी करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता गुजरात सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 1 जुलैपासून या परीक्षा होणार होत्या. मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारनेही बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 

 

गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. महाराष्ट्र सरकारही राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तर, आज कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून १२ वी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाGujaratगुजरातMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानEducationशिक्षण