शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

महाकुंभला एकाच बसमधून उतरले, १२० जणांना AI कॅमेरांनी टिपले; चेंगराचेंगरीमागे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:09 IST

मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत.

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत सरकारने जो आकडा दिला, त्यापेक्षा जास्तीचा आकडा असल्याचा दावा विरोधी पक्षांसह विविध स्तरावर केला जात आहे. आज राज्यसभेत सपा खासदार जया बच्चन यांनी मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचा दावा केला आहे. अशातच या चेंगराचेंगरीमागे कट असल्याचा संशय एसटीएफला येत आहे. 

मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत. काही मृतदेहांवर ६० च्या वरचे नंबर लिहिलेले होते, असेही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले जात आहे. करोडो लोक उपस्थित असलेल्या महाकुंभमध्ये काही घातपात करण्याच्या उद्देशाने काही लोक घुसले होते असा संशय तपास यंत्रणांना आला आहे. 

महाकुंभमध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी एआय कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेरांनी एकाच बसमधून आलेल्या १२० जणांना टिपले आहे. हे संदिग्ध महाकुंभमध्ये गोंधळ घालण्यासाठी आले होते, असे सुत्रांकडून सांगितले जात आगे. या लोकांना ओळखण्यासाठी चौकशी केली जात आहे. याचबरोबर छोटी मोठी दुकाने, माळा, प्रसाद आदी विकणाऱ्या फिरत्यांनाही विचारले जात आहे. या कटाच्या तपासासाठी १२ अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. 

एक नाही तीन वेळा चेंगराचेंगरी...दैनिक भास्करच्या दाव्यानुसार महाकुंभमध्ये ही एकच चेंगराचेंगरी नाही तर तीन ठिकाणी चेंगराचेगरी झाली आहे. या दुसऱ्या चेंगराचेंगरीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.  काही हॉस्पिटलच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. काही मृतदेहांना झाकलेल्या पिशवीवर ६१, ६२- ६३ असे आकडे लिहिलेले होते. तसेच नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले मृतदेह आणि विविध हॉस्पिटलमध्ये असलेले मृतदेह, नाव न समजलेले मृतदेह यांच्या आकड्याचा मेळही लागत नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा