शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महाकुंभला एकाच बसमधून उतरले, १२० जणांना AI कॅमेरांनी टिपले; चेंगराचेंगरीमागे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:09 IST

मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत.

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत सरकारने जो आकडा दिला, त्यापेक्षा जास्तीचा आकडा असल्याचा दावा विरोधी पक्षांसह विविध स्तरावर केला जात आहे. आज राज्यसभेत सपा खासदार जया बच्चन यांनी मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचा दावा केला आहे. अशातच या चेंगराचेंगरीमागे कट असल्याचा संशय एसटीएफला येत आहे. 

मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत. काही मृतदेहांवर ६० च्या वरचे नंबर लिहिलेले होते, असेही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले जात आहे. करोडो लोक उपस्थित असलेल्या महाकुंभमध्ये काही घातपात करण्याच्या उद्देशाने काही लोक घुसले होते असा संशय तपास यंत्रणांना आला आहे. 

महाकुंभमध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी एआय कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेरांनी एकाच बसमधून आलेल्या १२० जणांना टिपले आहे. हे संदिग्ध महाकुंभमध्ये गोंधळ घालण्यासाठी आले होते, असे सुत्रांकडून सांगितले जात आगे. या लोकांना ओळखण्यासाठी चौकशी केली जात आहे. याचबरोबर छोटी मोठी दुकाने, माळा, प्रसाद आदी विकणाऱ्या फिरत्यांनाही विचारले जात आहे. या कटाच्या तपासासाठी १२ अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. 

एक नाही तीन वेळा चेंगराचेंगरी...दैनिक भास्करच्या दाव्यानुसार महाकुंभमध्ये ही एकच चेंगराचेंगरी नाही तर तीन ठिकाणी चेंगराचेगरी झाली आहे. या दुसऱ्या चेंगराचेंगरीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.  काही हॉस्पिटलच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. काही मृतदेहांना झाकलेल्या पिशवीवर ६१, ६२- ६३ असे आकडे लिहिलेले होते. तसेच नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले मृतदेह आणि विविध हॉस्पिटलमध्ये असलेले मृतदेह, नाव न समजलेले मृतदेह यांच्या आकड्याचा मेळही लागत नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा