शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 08:31 IST

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये उन्हाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. प्रचंड उन्हामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. औरंगाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक राज्यांप्रमाणेच बिहार आणि झारखंडमध्येही कालचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. पलामू जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या तीन दिवसांपासून पलामूचे कमाल तापमान ४७ अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. सूर्य उगवताच उष्णतेमुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाल्याचं लोक सांगत आहेत.

बिहारमध्येही अशीच परिस्थिती आहे. बक्सरमध्ये सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने बुधवारी सर्व खासगी आणि सरकारी शाळा, कोचिंग संस्था आणि अंगणवाडी केंद्रे ८ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेखपुरा, बेगुसराय, मुझफ्फरपूर आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमधून आणि इतर भागांमध्ये कडक उन्हामुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी बेशुद्ध पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. 

येत्या काही दिवसांत बिहारच्या अनेक भागात भीषण गरमी कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरलं. औरंगाबाद (४६.१ अंश सेल्सिअस), देहरी (४६अंश सेल्सिअस), गया (४५.२ अंश सेल्सिअस), अरवल (४४.८ अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (४४.१ अंश सेल्सिअस) या ठिकाणी ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पाटणा येथे कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर लोकांना वारंवार 'या' सूचना केल्या जात आहेत 

- उन्हात जाणं शक्यतो टाळा. उष्णतेची लाट/उष्णतेच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्या.- शक्य तितके पाणी प्या. तहान लागली नसली तरी पाणी प्या.- हलक्या रंगाचे घाम शोषणारे सुती कपडे घाला.- घराबाहेर पडताना सनग्लासेस, छत्री, टोपी यांचा वापर करा.- तीव्र सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छत्री वापरा.- ताक, लस्सी, नारळपाणी, लिंबू पाणी, फळांचा ज्यूस प्या. - अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. 

टॅग्स :BiharबिहारHeat Strokeउष्माघातJharkhandझारखंडTemperatureतापमान