शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 08:31 IST

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये उन्हाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. प्रचंड उन्हामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. औरंगाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक राज्यांप्रमाणेच बिहार आणि झारखंडमध्येही कालचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. पलामू जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या तीन दिवसांपासून पलामूचे कमाल तापमान ४७ अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. सूर्य उगवताच उष्णतेमुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाल्याचं लोक सांगत आहेत.

बिहारमध्येही अशीच परिस्थिती आहे. बक्सरमध्ये सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने बुधवारी सर्व खासगी आणि सरकारी शाळा, कोचिंग संस्था आणि अंगणवाडी केंद्रे ८ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेखपुरा, बेगुसराय, मुझफ्फरपूर आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमधून आणि इतर भागांमध्ये कडक उन्हामुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी बेशुद्ध पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. 

येत्या काही दिवसांत बिहारच्या अनेक भागात भीषण गरमी कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरलं. औरंगाबाद (४६.१ अंश सेल्सिअस), देहरी (४६अंश सेल्सिअस), गया (४५.२ अंश सेल्सिअस), अरवल (४४.८ अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (४४.१ अंश सेल्सिअस) या ठिकाणी ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पाटणा येथे कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर लोकांना वारंवार 'या' सूचना केल्या जात आहेत 

- उन्हात जाणं शक्यतो टाळा. उष्णतेची लाट/उष्णतेच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्या.- शक्य तितके पाणी प्या. तहान लागली नसली तरी पाणी प्या.- हलक्या रंगाचे घाम शोषणारे सुती कपडे घाला.- घराबाहेर पडताना सनग्लासेस, छत्री, टोपी यांचा वापर करा.- तीव्र सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छत्री वापरा.- ताक, लस्सी, नारळपाणी, लिंबू पाणी, फळांचा ज्यूस प्या. - अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. 

टॅग्स :BiharबिहारHeat Strokeउष्माघातJharkhandझारखंडTemperatureतापमान