शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावर सहा तास खोळंबले 114 प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:57 IST

एअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते.

ठळक मुद्देएअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते. विमानातील तांत्रित बिघाडामुळे उशिर झाल्याने 30 प्रवाशांनी त्यांची तिकिट रद्द केली तर 84 लोकांनी ते विमान दुरूस्त होण्याची वाट पाहिली. 

जयपूर- एअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते. विमानातील तांत्रित बिघाडामुळे उशिर झाल्याने 30 प्रवाशांनी त्यांची तिकिट रद्द केली तर 84 लोकांनी ते विमान दुरूस्त होण्याची वाट पाहिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा एअरक्राफ्टचं टायर खराब झाल्याचा रिपोर्ट आला. अधिकाऱ्यांनी सुरूवातीला हा रिपोर्ट खारीज केला पण काहीवेळानंतर समस्या सुरूच राहिल्याने टायर बदलण्याची परवानगी दिली. या बिघाडामुळे जयपूरहून दिल्लीसाठी दुपारी दीड वाजताचं विमान संध्याकाळी आठ वाजता निघालं. 

सुत्रांच्या माहितीनुसार, विमानाचं टायर जयपूरमध्ये विमान लॅण्ड होताना पंक्चर झालं होतं. विमान टेक ऑफ करायचा आधी तपासणी सुरू असताना या बिघाडाबद्दल माहिती मिळाल्याचं एअरलाइन्स प्रशासनाने स्पष्ट केलं. टायरवर थोडे कट्स दिसल्याने ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

विमानाचं टायर पक्चर झाल्याची कुठलीही घटना घडली नाही. एअर इंडियाचं विमान क्रमांक 491 टेक ऑफसाठी तयारी करत असताना स्टाफला टायरवर कट्स दिसले. त्यानंतर लगेचच टायर बदलण्यात आलं, अशी माहिती एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे मॅनेजर जयदीप सिंह बल्हारा यांनी दिली आहे. आणखी वाचा : इंडिगोविरोधात देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय चलन स्वीकारण्यास दिला नकार

टॅग्स :AirportविमानतळAir Indiaएअर इंडियाTravelप्रवास