शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आसाम निवडणुकीच्या काळात 110 कोटींचे साहित्य केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 06:06 IST

आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले.

गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले. राज्याच्या आजवरच्या निवडणुकीच्या काळातील ही सर्वाधिक जप्ती आहे, असेही ते म्हणाले. राज्यात २०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्राच्या तसेच राज्याच्या विविध संस्थांनी २० कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले होते. यावेळी २६ फेब्रुवारी रोजी आसाम विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत ११०.८३ कोटी रुपयांची रोख रक्कम व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३४.२९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ३३.२९ कोटी किमतीची १६.६१ लाख लीटर दूर, २४.५० कोटी रुपयांची रोख रक्कम व ३.६८ कोटी रुपयांचे सोने-चांदी जप्त करण्यात आले.आसाम पोलीस, फिरती पथके, अबकारी विभागासह अन्य संस्थांनी या सर्व वस्तू आसामच्या विविध जिल्ह्यांतून जप्त केल्या आहेत. भेटवस्तू, विदेशी बनावटीच्या सिगारेट, पान मसाला, सुपारी यासह अन्य  अनेक वस्तूही जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत १४.९१ कोटी रुपये आहे.राज्यात निवडणूक खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यासंबंधीचे ५० गुन्हे नोंदले गेले आहेत. तर अबकारी नियमांच्या उल्लंघनाबाबत ५,२३४ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तथापि, या संबंधात किती लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, याची त्यांनी माहिती दिली नाही. आचारसंहिता भंगची २,६९६ प्रकरणेआदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची आसाममध्ये एकूण २,६९६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यात १,२७२ प्रकरणे ऑनलाइन ई-व्हिजील ॲपच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहेत. यातील ९०८ प्रकरणे योग्य ठरली आहेत.- अर्पणा माधव, गुवाहाटी

टॅग्स :AssamआसामAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१