शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रेशन कार्डला आधारशी न जोडल्याचा भुर्दंड चिमुकलीला, भुकेनं गेला 11 वर्षीय मुलीचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 18:48 IST

सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला आहे. रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे हा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

झारखंड- सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला आहे. रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे हा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोषी कुमारी नावाची मुलगी आठ दिवस अन्नाविना होती. त्यामुळे तिचा 28 सप्टेंबर रोजी भूकबळी गेला. अन्न सुरक्षेसाठी काम करणा-या एका संस्थेनं याचा खुलासा केला आहे.संस्थेच्या माहितीनुसार, करीमती गावातील संतोषी कुमार हिचा गेल्या महिन्याच्या 28 तारखेला मृत्यू झाला. कारण तिच्या घरात रेशनचं नव्हतं. संतोषीची आई कोईली देवी यांनी एका संस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे. आधार कार्ड लिंक न केल्यामुळे फेब्रुवारीपासून त्यांना रेशनिंगवरचं स्वस्त धान्य मिळालं नाही. त्याच दरम्यान 27 सप्टेंबर रोजी संतोषीच्या तब्येतीत बिघाड झाला. तिच्या पोटात अचानकपणे दुखायला लागलं आणि तिचे भुकेनं जीव गेला. परंतु जलदेगा ब्लॉक विकास अधिकारी संजय कुमार यांनी संतोषीचा भुकेनं मृत्यू झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. त्या मुलीचा मृत्यू मलेरियानं झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे त्यांना रेशनिंगवरचं स्वस्त धान्य मिळत नसल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. भूकबळी गेलेली संतोषी शाळेतील माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारचं स्वतःचं पोट भरत होती.दुर्गा पूजेची सुट्टी असल्याकारणानं शाळा बंद होती. त्यामुळे तिला अनेक दिवस उपाशी राहावं लागलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. भूकबळी गेल्यामुळे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सिमडेगा उपायुक्तांकडून 11 वर्षांच्या झालेल्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात माहिती घेतली. मुलीचा भूकबळीनं मृत्यू झाल्यामुळे मला अतीव दुःख झालंय. सिमडेगाचे उपायुक्तांना 24 तासांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकाराला जबाबदार असणा-या दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तीन सदस्यांची चौकशी समिती या मृत्यूचा तपास करतेय. चौकशी समितीच्या माहितीनुसार त्या मुलीचा मृत्यू मलेरियानं झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांनी उपायुक्तांना 24 तासांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री या प्रकरणाची चौकशी करणार आहेत

टॅग्स :Deathमृत्यूAdhar Cardआधार कार्ड