शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डला आधारशी न जोडल्याचा भुर्दंड चिमुकलीला, भुकेनं गेला 11 वर्षीय मुलीचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 18:48 IST

सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला आहे. रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे हा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

झारखंड- सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला आहे. रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे हा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोषी कुमारी नावाची मुलगी आठ दिवस अन्नाविना होती. त्यामुळे तिचा 28 सप्टेंबर रोजी भूकबळी गेला. अन्न सुरक्षेसाठी काम करणा-या एका संस्थेनं याचा खुलासा केला आहे.संस्थेच्या माहितीनुसार, करीमती गावातील संतोषी कुमार हिचा गेल्या महिन्याच्या 28 तारखेला मृत्यू झाला. कारण तिच्या घरात रेशनचं नव्हतं. संतोषीची आई कोईली देवी यांनी एका संस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे. आधार कार्ड लिंक न केल्यामुळे फेब्रुवारीपासून त्यांना रेशनिंगवरचं स्वस्त धान्य मिळालं नाही. त्याच दरम्यान 27 सप्टेंबर रोजी संतोषीच्या तब्येतीत बिघाड झाला. तिच्या पोटात अचानकपणे दुखायला लागलं आणि तिचे भुकेनं जीव गेला. परंतु जलदेगा ब्लॉक विकास अधिकारी संजय कुमार यांनी संतोषीचा भुकेनं मृत्यू झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. त्या मुलीचा मृत्यू मलेरियानं झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे त्यांना रेशनिंगवरचं स्वस्त धान्य मिळत नसल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. भूकबळी गेलेली संतोषी शाळेतील माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारचं स्वतःचं पोट भरत होती.दुर्गा पूजेची सुट्टी असल्याकारणानं शाळा बंद होती. त्यामुळे तिला अनेक दिवस उपाशी राहावं लागलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. भूकबळी गेल्यामुळे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सिमडेगा उपायुक्तांकडून 11 वर्षांच्या झालेल्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात माहिती घेतली. मुलीचा भूकबळीनं मृत्यू झाल्यामुळे मला अतीव दुःख झालंय. सिमडेगाचे उपायुक्तांना 24 तासांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकाराला जबाबदार असणा-या दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तीन सदस्यांची चौकशी समिती या मृत्यूचा तपास करतेय. चौकशी समितीच्या माहितीनुसार त्या मुलीचा मृत्यू मलेरियानं झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांनी उपायुक्तांना 24 तासांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री या प्रकरणाची चौकशी करणार आहेत

टॅग्स :Deathमृत्यूAdhar Cardआधार कार्ड