शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डला आधारशी न जोडल्याचा भुर्दंड चिमुकलीला, भुकेनं गेला 11 वर्षीय मुलीचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 18:48 IST

सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला आहे. रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे हा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

झारखंड- सिमडेगा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचा भूकबळी गेला आहे. रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे हा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोषी कुमारी नावाची मुलगी आठ दिवस अन्नाविना होती. त्यामुळे तिचा 28 सप्टेंबर रोजी भूकबळी गेला. अन्न सुरक्षेसाठी काम करणा-या एका संस्थेनं याचा खुलासा केला आहे.संस्थेच्या माहितीनुसार, करीमती गावातील संतोषी कुमार हिचा गेल्या महिन्याच्या 28 तारखेला मृत्यू झाला. कारण तिच्या घरात रेशनचं नव्हतं. संतोषीची आई कोईली देवी यांनी एका संस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे. आधार कार्ड लिंक न केल्यामुळे फेब्रुवारीपासून त्यांना रेशनिंगवरचं स्वस्त धान्य मिळालं नाही. त्याच दरम्यान 27 सप्टेंबर रोजी संतोषीच्या तब्येतीत बिघाड झाला. तिच्या पोटात अचानकपणे दुखायला लागलं आणि तिचे भुकेनं जीव गेला. परंतु जलदेगा ब्लॉक विकास अधिकारी संजय कुमार यांनी संतोषीचा भुकेनं मृत्यू झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. त्या मुलीचा मृत्यू मलेरियानं झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना रेशन कार्डला आधारशी न जोडल्यामुळे त्यांना रेशनिंगवरचं स्वस्त धान्य मिळत नसल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. भूकबळी गेलेली संतोषी शाळेतील माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारचं स्वतःचं पोट भरत होती.दुर्गा पूजेची सुट्टी असल्याकारणानं शाळा बंद होती. त्यामुळे तिला अनेक दिवस उपाशी राहावं लागलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. भूकबळी गेल्यामुळे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सिमडेगा उपायुक्तांकडून 11 वर्षांच्या झालेल्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात माहिती घेतली. मुलीचा भूकबळीनं मृत्यू झाल्यामुळे मला अतीव दुःख झालंय. सिमडेगाचे उपायुक्तांना 24 तासांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकाराला जबाबदार असणा-या दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. तीन सदस्यांची चौकशी समिती या मृत्यूचा तपास करतेय. चौकशी समितीच्या माहितीनुसार त्या मुलीचा मृत्यू मलेरियानं झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांनी उपायुक्तांना 24 तासांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री या प्रकरणाची चौकशी करणार आहेत

टॅग्स :Deathमृत्यूAdhar Cardआधार कार्ड