शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

११ आत्महत्या मृतात्म्याच्या आदेशावरून? लेखी टिपणांचे गूढ; कुटुंबप्रमुख मृत वडिलांच्या ‘आज्ञे’त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 05:26 IST

उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींनी केलेल्या कथित आत्महत्या कुटुंबप्रमुख ललित भाटिया यांना त्यांच्या दिवंगत वडिलांनी स्वप्नात दिलेल्या आदेशाबरहुकूम घडवून आणल्या असाव्यात, असे संकेत पोलिसांना तपासात मिळाले आहेत.

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींनी केलेल्या कथित आत्महत्या कुटुंबप्रमुख ललित भाटिया यांना त्यांच्या दिवंगत वडिलांनी स्वप्नात दिलेल्या आदेशाबरहुकूम घडवून आणल्या असाव्यात, असे संकेत पोलिसांना तपासात मिळाले आहेत.पोलिसांना दोन वह्यांमध्ये लिहिलेली सुमारे ५० पानांची टिपणे मिळाली आहेत. ते लिखाण ललित भाटिया या घरातील कर्त्या पुरुषाचे असल्याचे स्पष्ट झाले. टिपणांची वाक्यरचना दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून लिहिल्यासारखी तृतीयपुरुषी एकवचनातील आहे.पोलीस यातील गर्भित अर्थ जाणून घेण्यासाठी धडपडत आहेत. ललित यांनी कित्येक वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेले त्यांचे वडील स्वप्नात येऊन आपण सर्व निर्णय ‘उपर से आदेश’ आल्यानुसार घेतो, असे लिहिले आहे. कदाचित वडिलांनी दिलेल्या दृष्टांतातील क्रियेनुसारच त्यांनी स्वत:सह घरातील सर्वांच्या ‘मोक्षा’ची पद्धतशीर आखणी केली असावी, असे दिसते.पोलीस लिखाणाच्या विश्लेषणासाठी मनोविकारतज्ज्ञांची मदत घेण्याच्या विचारात आहेत.ही टिपणे २०१५ पासूनची आहेत व त्यावरची शेवटची तारीख यंदाची २५ जून ही आहे. टिपणे संगतवार वाटत असून, या आत्महत्यांसाठी घरातील सर्वांची बºयाच आधीपासून मानसिक तयारी करून घेण्यात आली होती व त्याची रंगीत तालीमही झाली होती, असे दिसते.वडाच्या पारंब्यांचे प्रतीकया टिपणांमध्ये पूर्ण श्रद्धेने वटपूजा करण्याचे महात्म्य विशद करण्यात आले आहे. त्यातही वटवृक्षाच्या खोडाऐवजी त्याच्या पारंब्यांची पूजा करण्यावर भर दिलेला दिसतो. कदाचित फासावर लटकलेल्या देहांचे वडाच्या पारंब्या हे प्रतीक मानले गेले असावे, असेही काहींना वाटते.

टॅग्स :delhiदिल्लीDeathमृत्यू