शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

पोलिसांच्या ११ कुटुंबीयांचे अपहरण; काश्मीरमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 07:03 IST

अतिरेकी घेत आहेत बदला : पोलिसांवरील हल्ल्यांमध्येही होत आहे सतत वाढ

श्रीनगर : काश्मीरमधील अतिरेक्यांनी पोलिसांच्या हत्या करतानाच, आता त्यांच्या कुटुंबीयांचे अपहरणही सुरू केले असून, त्यामुळे पोलीस व त्यांचे नातेवाईक हादरून गेले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची मुले, वडील, भाऊ तसेच पुतणे अशा एकूण ११ जणांचे अतिरेक्यांनी २४ तासांत अपहरण केले आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून, पोलिसांच्या वसाहतींभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलिसांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अपहरणाचे हे प्रकार शोपियां, अनंतनाग, पुलवामा, अवंतीपोरा व कुलगाम या पाच जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. याच आठवड्यात अतिरेक्यांनी चार पोलिसांचीही हत्या केली होती. पोलीस अधिकाºयाच्या मुलाच्या पहिल्या अपहरणाचा प्रकार २८ आॅगस्ट रोजी घडला. त्यामुळे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय हेच आता अतिरेक्यांचे टार्गेट असल्याचे दिसत आहे. अपहरण केलेल्यांच्या शोधासाठी पोलीस व सुरक्षा दलांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. अपहरण केलेल्यांमध्ये पोलीस उपअधीक्षक मोहम्मद सय्यद शाह यांच्या पुतण्याचाही समावेश आहे. अतिरेक्यांनी काही पोलिसांच्या घरात घुसून, तेथील एका सज्ञान पुरुषाचेच अपहरण अपहरण केले आहे. त्यांनी घरातील महिलांना हात लावलेला वा त्रास दिलेला नाही. पण आपल्या कुटुंबीयांनाच टार्गेट केले जात असल्याने पोलीस कर्मचारीही धास्तावून गेले आहेत.

अतिरेक्यांच्या कुटुंबीयांना वा जवळच्या नातेवाइकांना पोलीस व अतिरेक्यांनी अलीकडे ताब्यात घेतले होते. त्यापैकी काहींना अटकही केली. हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनच्या एका मुलाला गुरुवारी अटक करण्यात आली. दुसरा मुलगा आधीपासूनच अटकेत आहे. तसेच हिजबुलचा कमांडर रियाझ नायकू यांच्या वडिलांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यांच्याशिवाय अनेक अतिरेक्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळेच त्याचा बदला म्हणून पोलिसांच्या कुटुंबीयांचे अपहरण अतिरेक्यांनी सुरू केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी आपल्या कुटुंबीयांना त्रास दिल्यास आम्हीही तसेच करू नये, असाच संदेश अतिरेक्यांनी यातून दिला आहे.३५अ वरील सुनावणी आता जानेवारीतनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणाºया राज्यघटनेच्या कलम ३५ अ वरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. अ‍ॅड. अश्विानीकुमार उपाध्याय यांनी या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली असून, तिच्यावरील सुनावणी आता १९ जानेवारी २0१९ रोजी होईल. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुनावणीला स्थगिती विनंती केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला केली. सर्व सुरक्षा यंत्रणा निवडणुकांची तयारी करण्यात व्यग्र असल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले.काय आहे हे कलमया कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाºया व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही, राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळू शकत नाही वा सरकारी नोकरीही तेथे मिळत नाही. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीएम व काँग्रेसचा या कलमाला पाठिंबा आहे, तर हे कलम रद्द व्हावे, अशी भाजपाच्या अनेक नेत्यांची भूमिका आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसterroristदहशतवादी