शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नवी दिल्लीतील सामूहिक आत्महत्या : रजिस्टरमधून समोर आल्या या 10 धक्कादायक गोष्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 14:28 IST

राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरात एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूमागील कोड अद्यापपर्यंत सुटू शकलेले नाही.

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतील बुरारी परिसरात एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूमागील कोड अद्यापपर्यंत सुटू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यातील 10 जणांचे मृतदेह हॉलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. तर एक मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी 10 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, त्या शेजारील खोलीतून पोलिसांनी दोन रेजिस्टर ताब्यात घेतले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये अलौकिक शक्ती, मोक्षप्राप्तीसाठी मृत्यू हाच एकमेव मार्ग, आत्मा आणि अध्यात्म यांचा परस्परांशी असलेला संबंध अशा स्वरुपाचा मजकूर आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रजिस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे की, ''रात्री एक वाजता जप सुरू करा. कापड आणि कापसाच्या मदतीनं मृत्यपूर्वीच आपले डोळे बंद करुन घ्या. मरताना जिवाची तडफड होईल,त्यामुळे हात बांधून ठेवावेत. हे कार्य गुरुवारी आणि शनिवारी करणं चांगले ठरेल''. दरम्यान या रजिस्टरमध्ये आणखी काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  

या रजिस्टरमधील शेवटची नोंद ही 26 जूनला झाली आहे. 'आपण 30 जूनला देवाला भेटणार आहोत. देवाच्या भेटीसाठी आपण सर्व हात, पाय, तोंड पूर्णपणे बांधू,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आहे. 

नेमका काय आहे रजिस्टरमधील मजकूर ?1. काहीच दिसता कामा नये, अशा पद्धतीनं डोळ्यांवर योग्य पद्धतीनं पट्टी बांधवी. दोरीसोबत सुती साड्यांचाही वापर करावा.2. सलग सात दिवस पूजा करावयाची आहे. मनानं आणि श्रद्धेनं ही पूजा करावी. पूजेदरम्यान जर घराबाहेरील एखादी व्यक्ती आली तर पूजा दुसऱ्या दिवशी करावी.  3. पूजेचं कार्य गुरुवारी किंवा रविवारी करावे. 4. वयोवृद्ध महिला उभी राहण्यास सक्षम नसल्यास, त्यांना वेगळ्या खोलीमध्ये नेऊन झोपवावे. दरम्यान, या घटनेत वयोवृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या महिलेचा मृतदेह हॉलशेजारील खोलीत आढळून आला. 5. कुटुंबातील सर्व सदस्यांचे विचार एकसारखेच असावेत. असे असल्यासच तुमचे पुढील कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होईल. 6. जेव्हा सर्वजण आत्महत्या करतील, त्यावेळेस खोलीमध्ये थोड्या प्रमाणात प्रकाश असावा.7. हात बांधून झाल्यानंतर उर्वरित पट्ट्या डोळ्यांवर बांधव्यात. 8. तोंडदेखील पट्टी आणि रुमालानं बांधून घ्यावे. 9. कार्यादरम्यान जितकी चिकाटी आणि श्रद्धा दाखवली जाईल, याचे तेवढेच चांगले फळ मिळेल.10. रात्री उशिरा 12 ते 1 वाजेदरम्यान कार्य करावे, त्यापूर्वी हवन करावे लागणार आहे. 

 

टॅग्स :Burari Deathsबुरारी मृत्यूSuicideआत्महत्याNew Delhiनवी दिल्लीDeathमृत्यू