शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

१० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाइनच; विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 07:35 IST

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तसेच अन्य शिक्षण मंडळातर्फे १० वी व १२ वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तसेच अन्य शिक्षण मंडळातर्फे १० वी व १२ वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याला विरोध दर्शविणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. अशा याचिकामुळे विद्यार्थ्यांमध्ये खोटी आशा तसेच गोंधळ निर्माण होतो असे सुनावले. 

कोर्टाने न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले  की, अनेक राज्य शिक्षण मंडळांनी १० वी, १२ वी च्या परीक्षांच्या तारखा ही जाहीर केलेल्या नाहीत. त्याआधीच परीक्षा ऑफलाईन घेण्यास विरोध करणारी याचिका सादर करणे चुकीचे आहे. विद्यार्थी परीक्षांसाठी खूप तयारी करत असतात. त्यांना खोटी आशा दाखवू नका. या परीक्षांच्या स्वरूपाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्णय घेऊ द्या. तो चुकीचा वाटल्यास त्याला आव्हान देता येईल. 

कोरोनामुळे गेल्यावर्षी परीक्षा ऑनलाईन होण्यासंदर्भात कोर्टाने होकार दिला होता. मात्र असा आदेश म्हणजे नियम होऊ शकत नाही. मात्र आताच्या स्थितीत ऑफलाईनला विरोध करणाऱ्या याचिका निरर्थक ठरतात. २०२१ सालासाठीच्या एमबीबीएसची प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या सर्व बाबी याचिकादारांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घालाव्यात. तसेच सीबीएसई व अन्य शिक्षण मंडळाच्या १० वी व १२वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेऊ नयेत असा आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला. 

काही परीक्षांचे निकाल लागले नाहीतयाचिकादारांच्या वकिलांनी सांगितले की, सीबीएसईने पहिल्या सत्राच्या परीक्षा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घेतल्या होत्या. त्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. विशिष्ट मुदतीत निकाल जाहीर करण्याचे बंधन घालणे आवश्यक आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयexamपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या