शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

100 शास्त्रज्ञ, 2 वर्षांची तयारी; भारताच्या 'शक्ती'शाली मिशनची इनसाईट स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 12:02 IST

भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली.

नवी दिल्ली -  भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. भारताच्यामिशन शक्तीच्या यशाची चर्चा जगभरात सुरू आहे. दरम्यान, मिशन शक्तीची पूर्वतयारी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती, गेल्या सहा महिन्यांपासून या मोहिमेच्या मिशन मोडवर काम सुरू होते. या मोहिमेच्या यशासाठी सुमारे 100 शास्त्रज्ञ काम करत होते, अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख जी. एस. रेड्डी यांनी दिली आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डीआरडीओच्या प्रमुखांनी मिशन शक्तीविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ''मिशन शक्तीच्या यशासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे 100 शास्त्रज्ञ सातत्याने काम करत होते. तसेच या मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेने वाटचाल करत होते. या मोहिमेची इत्यंभूत माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येत होती. तसेच डोवाल ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत होते.''

''या मोहिमेसाठी खूप आधीच सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान आम्ही आमच्या लक्ष्याला कायनेटिक किल म्हणजेच थेट उपग्रहालाच लक्ष्य केले. यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली. विशेष बाब म्हणजे या मोहिमेसाठी वापरण्यात आलेले सर्व तंत्रज्ञात हे भारतातच विकसित करण्यात आलेले होते. ते संपूर्ण पणे यशस्वी झाले.'' असेही डीआरडीओचे प्रमुख जी. एस. रेड्डी यांनी पुढे सांगितले. ''A-SAT हे क्षेपणास्त्र लो अर्थ ऑर्बिट मध्ये संचार करणाऱ्या LEO उपग्रहांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. आमच्याकडे यापेक्षा मोठे लक्ष्य भेदण्याचीसुद्ध क्षमता आहे. मात्र कुठल्याही देशाचे नुकसान करण्याची आमची इच्छा नसल्याने आम्ही सुरुवातील LEO लाच लक्ष्य करण्याचे ठरवले.''असेही रेड्डी यांनी पुढे स्पष्ट केले. 

 

दरम्यान, अंतराळात संचार करणाऱ्या उपग्रहांना लक्ष्य करण्याचे तंत्र विकसित करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतरचा तिसरा देश ठरला आहे. जेव्हा चीनने अशा प्रकारची चाचणी घेतली होती. तेव्हा संपूर्ण जगाने त्याचा निषेध नोंदवला होता. मात्र भारताने केलेल्या या चाचणीनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने फारसा विरोध केलेला नाही.   

 

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीIndiaभारतDRDOडीआरडीओ