शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 10:05 IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित असून, त्यात बदल नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लगबगीने वेग घेतला आहे. २२ तारीख जवळ येत आहे, तसे राजकारणही अधिक तापताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेत्या सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी अयोध्येच्या सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे. असे असताना मात्र काँग्रेसचे १०० नेते अयोध्येला जाण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. 

काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कार्यक्रमात कोणताही बदल नाही, माझ्यासह राज्यातील विविध पक्षांचे नेते ठरल्यानुसार, १५ जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत. पवित्र शहर अयोध्या भेटीदरम्यान, पक्षाचे नेते शरयू नदीत स्नान करतील. नंतर राम मंदिर आणि हनुमानगढी मंदिरात प्रार्थना करतील. अजय राय यांनी सांगितले होते की, १५ जानेवारीला अयोध्येला जात आहे. आमचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारी अविनाश पांडे आणि ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि पी.एल. पुनियाही अयोध्येला जाणार आहेत. सुमारे १०० काँग्रेस नेते तेथे जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने दिल्याचे समजते.

अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित, त्यात बदल नाही

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचा अपूर्ण मंदिराच्या उद्घाटनामागील हेतू काय, अस सवाल काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला होता. काँग्रेस नेते अयोध्येला जाणार नाहीत, यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, २२ जानेवारीला होत असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा वेगळा आहे. आम्ही मकर संक्रांतीला जात आहोत. उत्तर प्रदेशचे राज्य प्रभारी अविनाश पांडे यांच्यासह सुमारे १०० काँग्रेस पदाधिकारी १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचे यापूर्वीच ठरले होते. त्यात बदल केलेला नाही.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळण्यावरून मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेरी लावण्यावरून अखिलेश यादव यांनी काही विधाने केली होती. तसेच निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले होते. यानंतर मात्र आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे, अशी कबुली अखिलेश यादव यांनी दिली. तसेच आमंत्रण मिळाले असले तरी या सोहळ्याला जाणार नाही, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश