शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 10:05 IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित असून, त्यात बदल नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लगबगीने वेग घेतला आहे. २२ तारीख जवळ येत आहे, तसे राजकारणही अधिक तापताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेत्या सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी अयोध्येच्या सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे. असे असताना मात्र काँग्रेसचे १०० नेते अयोध्येला जाण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. 

काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कार्यक्रमात कोणताही बदल नाही, माझ्यासह राज्यातील विविध पक्षांचे नेते ठरल्यानुसार, १५ जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत. पवित्र शहर अयोध्या भेटीदरम्यान, पक्षाचे नेते शरयू नदीत स्नान करतील. नंतर राम मंदिर आणि हनुमानगढी मंदिरात प्रार्थना करतील. अजय राय यांनी सांगितले होते की, १५ जानेवारीला अयोध्येला जात आहे. आमचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारी अविनाश पांडे आणि ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि पी.एल. पुनियाही अयोध्येला जाणार आहेत. सुमारे १०० काँग्रेस नेते तेथे जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने दिल्याचे समजते.

अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित, त्यात बदल नाही

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचा अपूर्ण मंदिराच्या उद्घाटनामागील हेतू काय, अस सवाल काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला होता. काँग्रेस नेते अयोध्येला जाणार नाहीत, यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, २२ जानेवारीला होत असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा वेगळा आहे. आम्ही मकर संक्रांतीला जात आहोत. उत्तर प्रदेशचे राज्य प्रभारी अविनाश पांडे यांच्यासह सुमारे १०० काँग्रेस पदाधिकारी १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचे यापूर्वीच ठरले होते. त्यात बदल केलेला नाही.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळण्यावरून मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेरी लावण्यावरून अखिलेश यादव यांनी काही विधाने केली होती. तसेच निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले होते. यानंतर मात्र आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे, अशी कबुली अखिलेश यादव यांनी दिली. तसेच आमंत्रण मिळाले असले तरी या सोहळ्याला जाणार नाही, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश