शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

१० टक्के राखीव जागांमुळे सध्याच्या आरक्षणावर परिणाम नाही - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:44 IST

सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांचा दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मदुराई : सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांचा दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.येथील एका सभेत मोदी म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून तामिळनाडूतील काही जण स्वत:च्या स्वार्थासाठी संशयाचे वातावरण निर्माण करीत आहेत. समाजातील सर्व वर्गांतील लोकांना शिक्षणाची संधी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी १० टक्के राखीव जागांचा निर्णय घेण्यात आला. तामिळनाडूतील द्रमुक व अन्य काही पक्षांनी १० टक्के राखीव जागांच्या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात द्रमुकने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सामाजिक मागासलेपण हा राखीव जागांसाठी एकमात्र निकष असावा, अशी मागणी या पक्षांनी केली आहे.ते म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. आर्थिक घोटाळे करणारे भलेही विदेशात लपून बसले असतील, त्यांना तेथून जेरबंद करून भारतात आणू. तामिळनाडू येथील तोप्पूर येथे बांधण्यात येणाऱ्या एम्स रुग्णालय प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्या कार्यक्रमात ते म्हणाले की, सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आयुष्मान योजना राबविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)एमडीएमकेची निदर्शनेकावेरी व अन्य प्रश्नांवरून मोदी यांनी तामिळनाडूची फसवणूक केल्याचा आरोप करीत त्यांना एमडीएमके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदुराई येथे काळे झेंडे दाखविले. या पक्षाचे प्रमुख वायको यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या न्यूट्रिनो व हायड्रोकार्बन प्रकल्पांमुळे तामिळनाडूतील शेतकºयांची रोजीरोटीच जाणार आहे. कावेरी प्रश्नी मोदी सरकार कर्नाटकच्या फायद्याची भूमिका घेत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :reservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदी