शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Corona Vaccination: “१ लाख द्या मगच लस घेतो”; मुख्यमंत्र्यांच्या गावात डोस घेण्यासाठी का घाबरतायेत गावकरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:26 IST

गावातील लोकसंख्या १३५० इतकी आहे त्यात ४५ पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या ४२० पर्यंत आहे. यातील २७६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. शिवराज सिंह चौहान यांचं गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे.

ठळक मुद्देइतक्या लोकसंख्येच्या गावात दुसऱ्या डोससाठी फक्त ३८ जण पुढे आले.काही जण म्हणतात ऑनलाईन बुकींगमध्ये स्लॉट उपलब्ध होत नसल्याने लस घेतली नाही.गावात १७ मे रोजी लसीकरण सुरू होतं. तेव्हा केवळ ४ लोकांनीच लस घेतली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान(CM Shivraj Singh Chouhan) यांच्या गावात ४५ वर्षापेक्षा अधिक असलेल्या १० टक्के लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस(Corona Vaccination) घेण्यास नकार दिला आहे. काही लोक लसीचा डोस घेण्यापासून घाबरत आहेत तर काहींना स्लॉट बुक होत नाही. शिवराज सिंह चौहान यांचं गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे.

दै. भास्करच्या रिपोर्टनुसार, जैत गावात मागील दीड महिन्यात ६ जणांचा मृत्यू झाला. गावात झालेल्या मृत्यूनंतर कोरोनाचा सर्व्हे केला असता या गावात कोणीही सक्रीय रुग्ण नाही असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. तपासणीनंतर गावातील ५५ जणांना खोकला असल्याचं कळालं. गावातील लोकसंख्या १३५० इतकी आहे त्यात ४५ पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या ४२० पर्यंत आहे. यातील २७६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसऱ्या डोससाठी फक्त ३८ जण पुढे आले.

लसीकरणावरून लोकांमध्ये भय

गावातील लोकांशी बोलल्यानंतर सांगण्यात आलं की, याठिकाणी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना ताप आला. त्यामुळे दुसरा डोस घेण्याची भीती लोकांमध्ये आहे. तर काही जण म्हणतात ऑनलाईन बुकींगमध्ये स्लॉट उपलब्ध होत नसल्याने लस घेतली नाही. सैत गावचे सदस्य सत्य नारायण तिवारी म्हणाले की, गावातील ४ वृद्धांचा मृत्यू शहरात झाला आहे. परंतु ते नैसर्गिक मृत्यू आहेत. गावातील लोकांमध्ये लसीकरणाबद्दल जागृती निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.

आरोग्यसेविका सोनम सोनी म्हणाल्या की, जेव्हा गावात १७ मे रोजी लसीकरण सुरू होतं. तेव्हा केवळ ४ लोकांनीच लस घेतली. त्यामुळे उर्वरित लसीचे डोस खराब झाले. लसीकरण केल्यामुळे लोकांना ताप येत असल्याची दहशत लोकांच्या मनात आहे. त्यामुळे आम्ही लस घेणार नाही असं गावकरी सांगतात. तर काही जण १ लाख रुपये द्या तेव्हाच लस घेतो अशी अजब मागणीही करतायेत.

ना मास्क...ना जगजागृती

गावात प्रवेश घेताच मंदिराजवळील एका कठड्यावर दोन-ती गावकरी विनामास्क बसल्याचं दिसून आले. नर्मदा नदी किनारी तर काही जण नदीत आंघोळ करत होते. तर एकीकडे घराच्या बांधकामाचं काम सुरू होतं. त्यांनीही चेहऱ्यावर मास्क लावले नव्हते.

गावकऱ्यांचा गैरसमज

पहिल्यांदा कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल व्हावं लागलं. ज्यांनी लस घेतली होती त्यांना ताप आला. ते आठवडाभर तापातच होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मग रुग्णालयात जाऊन गोळ्या औषधं घ्यायची की पोट भरायचं? त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेण्याची हिंमत होत नाही असं ७० वर्षीय फूलसिंह कोवट सांगतात.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसChief Ministerमुख्यमंत्रीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान