शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Corona Vaccination: “१ लाख द्या मगच लस घेतो”; मुख्यमंत्र्यांच्या गावात डोस घेण्यासाठी का घाबरतायेत गावकरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:26 IST

गावातील लोकसंख्या १३५० इतकी आहे त्यात ४५ पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या ४२० पर्यंत आहे. यातील २७६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. शिवराज सिंह चौहान यांचं गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे.

ठळक मुद्देइतक्या लोकसंख्येच्या गावात दुसऱ्या डोससाठी फक्त ३८ जण पुढे आले.काही जण म्हणतात ऑनलाईन बुकींगमध्ये स्लॉट उपलब्ध होत नसल्याने लस घेतली नाही.गावात १७ मे रोजी लसीकरण सुरू होतं. तेव्हा केवळ ४ लोकांनीच लस घेतली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान(CM Shivraj Singh Chouhan) यांच्या गावात ४५ वर्षापेक्षा अधिक असलेल्या १० टक्के लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस(Corona Vaccination) घेण्यास नकार दिला आहे. काही लोक लसीचा डोस घेण्यापासून घाबरत आहेत तर काहींना स्लॉट बुक होत नाही. शिवराज सिंह चौहान यांचं गाव सीहोर जिल्ह्यातील जैत येथे आहे.

दै. भास्करच्या रिपोर्टनुसार, जैत गावात मागील दीड महिन्यात ६ जणांचा मृत्यू झाला. गावात झालेल्या मृत्यूनंतर कोरोनाचा सर्व्हे केला असता या गावात कोणीही सक्रीय रुग्ण नाही असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. तपासणीनंतर गावातील ५५ जणांना खोकला असल्याचं कळालं. गावातील लोकसंख्या १३५० इतकी आहे त्यात ४५ पेक्षा जास्त असणाऱ्यांची संख्या ४२० पर्यंत आहे. यातील २७६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसऱ्या डोससाठी फक्त ३८ जण पुढे आले.

लसीकरणावरून लोकांमध्ये भय

गावातील लोकांशी बोलल्यानंतर सांगण्यात आलं की, याठिकाणी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना ताप आला. त्यामुळे दुसरा डोस घेण्याची भीती लोकांमध्ये आहे. तर काही जण म्हणतात ऑनलाईन बुकींगमध्ये स्लॉट उपलब्ध होत नसल्याने लस घेतली नाही. सैत गावचे सदस्य सत्य नारायण तिवारी म्हणाले की, गावातील ४ वृद्धांचा मृत्यू शहरात झाला आहे. परंतु ते नैसर्गिक मृत्यू आहेत. गावातील लोकांमध्ये लसीकरणाबद्दल जागृती निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.

आरोग्यसेविका सोनम सोनी म्हणाल्या की, जेव्हा गावात १७ मे रोजी लसीकरण सुरू होतं. तेव्हा केवळ ४ लोकांनीच लस घेतली. त्यामुळे उर्वरित लसीचे डोस खराब झाले. लसीकरण केल्यामुळे लोकांना ताप येत असल्याची दहशत लोकांच्या मनात आहे. त्यामुळे आम्ही लस घेणार नाही असं गावकरी सांगतात. तर काही जण १ लाख रुपये द्या तेव्हाच लस घेतो अशी अजब मागणीही करतायेत.

ना मास्क...ना जगजागृती

गावात प्रवेश घेताच मंदिराजवळील एका कठड्यावर दोन-ती गावकरी विनामास्क बसल्याचं दिसून आले. नर्मदा नदी किनारी तर काही जण नदीत आंघोळ करत होते. तर एकीकडे घराच्या बांधकामाचं काम सुरू होतं. त्यांनीही चेहऱ्यावर मास्क लावले नव्हते.

गावकऱ्यांचा गैरसमज

पहिल्यांदा कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल व्हावं लागलं. ज्यांनी लस घेतली होती त्यांना ताप आला. ते आठवडाभर तापातच होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मग रुग्णालयात जाऊन गोळ्या औषधं घ्यायची की पोट भरायचं? त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेण्याची हिंमत होत नाही असं ७० वर्षीय फूलसिंह कोवट सांगतात.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसChief Ministerमुख्यमंत्रीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान