शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

धक्कादायक! विषारी दारूने घेतला 10 जणांचा बळी; 5 जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 12:31 IST

Poisonous Liquor : विषारी दारूने तब्बल 10 जणांचा बळी घेतला असून 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाचा संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. विषारी दारूने तब्बल 10 जणांचा बळी घेतला असून 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मोरेनाचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोरेना जिल्ह्यातील बागचीनी पोलीस ठाणे क्षेत्रातील मानपूर गाव आणि सुमावली येथील पहवाली गावातील लोक विषारी दारू प्यायल्याने आजारी पडले आहेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काहींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ग्वालियरला हलवण्यात आलं आहे. विषारी दारू प्यायल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही महिन्यांपूर्वी मध्‍यप्रदेशच्या उज्जैन (Ujjain) मध्ये एक अत्यंत भयंकर घटना समोर आली असून एकच खळबळ उडाली होती. विषारी दारुमुळे (Poisonous Liquor) 14 जणांचा मृत्यू झाला होता. अवैध दारूविरोधात कारवाईत 10 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच या घटनेनंतर खारा भागातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या प्रकरणी एसआयटीला चौकशीचे आदेश दिले आहेत. फक्त उज्जैन नाही तर संपूर्ण राज्यात अशा स्वरुपातील प्रकरणांवर लक्ष ठेवलं जाईल. जेथे कोठेही विषारी दारू तयार केली जात असल्याचा संशय येईल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे 86 जणांचा मृत्यू; 25 जणांना अटक

पंजाबच्या तीन जिल्ह्यांत विषारी दारू पिऊन दगावलेल्या लोकांची संख्या आता 86 च्या वर गेली होती. तसेच याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली होती. तर 13 अधिकाऱ्यांसह दोन पोलिस ठाण्यांचे प्रभारी आणि एका डीएसपीला निलंबित करण्यात आले होते. 100 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही करण्यात आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबास दोन लाख रुपयांच्या मदतीची ही घोषणा केली होती. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू