शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

प्रवास सुखकर होणार, आजपासून 10 नवीन 'सेवा सर्व्हिस' ट्रेन्स धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 10:34 IST

रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने आजपासून 10 नवीन ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने आजपासून 10 नवीन ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या सर्व ट्रेन्स या पॅसेंजर ट्रेन्स आहेत. 'सेवा सर्व्हिस' ट्रेन्समधील काही ट्रेन्स या दररोज तर काही ट्रेन्स आठवड्यातून सहा वेळा चालवण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने आजपासून 10 नवीन ट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत. या ट्रेन्सना 'सेवा सर्व्हिस' ट्रेन्स असं नाव देण्यात आलं आहे. मंगळवारी (15 ऑक्टोबर) रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान या ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या सर्व ट्रेन्स या पॅसेंजर ट्रेन्स आहेत. 

'सेवा सर्व्हिस' ट्रेन्समधील काही ट्रेन्स या दररोज तर काही ट्रेन्स आठवड्यातून सहा वेळा चालवण्यात येणार आहेत. दिल्ली आणि शामली, भुवनेश्वर आणि नारायणगड शहर, मुरकंगसेलेक आणि डिब्रूगड, कोटा आणि झालावाड, कोयंबत्तूर आणि पलानी दरम्यान रोज ट्रेन धावणार आहेत. वडनगर आणि महेसाणा, असारवा आणि हिंमतनगर, करूर आणि सलेम, यशवंतपूर आणि तुमुकूर, कोयंबत्तूर आणि पोल्लाची दरम्यान आठवड्यातून सहा वेळा ट्रेन्स चालवण्यात येणार आहे. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजता रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते 10 नविन सर्व्हिस ट्रेन्सचं उद्धाटन करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे एक नवीन वेळापत्रक तयार करणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दिल्ली आणि शामली दरम्यान एक नवीन ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली जंक्शनवरून सकाळी 8.40 मिनिटाला सुटेल तर सकाळी 11.50 मिनिटाला ती शामली येथे पोहचणार आहे. नवीन ट्रेन्समुळे प्रवाशांना प्रवास करणं अधिक सोपं जाणार आहे. 

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 'या' 30 ट्रेन्स रद्दसुट्टीच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर एकदा रेल्वेचं वेळापत्रक नक्की पाहा. कारण रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. हरिद्वार आणि लक्सर रेल्वे ट्रॅकवर काम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाचे काम लवकर व्हावे यासाठी या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेने 30 ट्रेन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने 13 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 30 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबाला ते हरिद्वार जाणाऱ्या प्रवाशांना याचा जास्त फटका बसणार आहे. मात्र रुळाचे काम पूर्ण झाल्यावर या रेल्वे पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहेत. मुरादाबाद विभागामार्फत हरिद्वार ते लक्सर दरम्यान रेल्वेरुळाचे डबल करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अंबालाचे वरिष्ठ रेल्वे अधिकारी हरी मोहन यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेdelhiदिल्ली