शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

१० माओवादी चकमकीत ठार, पोलीस, माओवादीविरोधी पथकाची छत्तीसगढ सीमेवर संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 6:07 AM

छत्तीसगढ व तेलंगणा सीमेवरील पुजारी कांकेर व तडपुलागुटा जंगलात शुक्रवारी १० माओवाद्यांना ठार करण्यात आले. माओवादीविरोधी विशेष पथक व छत्तीसगड पोलिसांनी सकाळी ६.३० वाजता संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

हैदराबाद : छत्तीसगढ व तेलंगणा सीमेवरील पुजारी कांकेर व तडपुलागुटा जंगलात शुक्रवारी १० माओवाद्यांना ठार करण्यात आले. माओवादीविरोधी विशेष पथक व छत्तीसगड पोलिसांनी सकाळी ६.३० वाजता संयुक्तरीत्या ही कारवाई केली. या कारवाईत विशेष पथकाच्या एका जवानाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कारवाईत माओवाद्यांचा नेता हरी भूषण ठार झाल्याचे वृत्त आहे. लष्करी डावपेच आखण्यात भूषणचा हातखंडा होता, असे बोलले जाते. जगन व बडे अप्पाराव हे नेतेही या कारवाईत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ६ महिलांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. या माओवाद्यांवर मोठ्या रकमेचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. या जंगलात माओवाद्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ७० जण उपस्थित होते. या बैठकीची माहिती स्थानिक पोलीस व विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कारवाई सुरू करण्याआधी सर्वसामान्य नागरिकांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली होती. या कारवाईला प्रत्युत्तर देताना माओवाद्यांनीही गोळीबार केला. उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.चकमकीत विशेष पथकातील सुशीलकुमार नावाच्या जवानाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेले काही दिवस माओवाद्यांकडून लष्करी तळांवर सतत हल्ले केले जात होते. त्यामुळे आजची कारवाई ही पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. >हरी भूषणवर होते ३० लाखांचे बक्षीसतेलंगणा राज्याची स्थापना झाल्यापासून हरी भूषण माओवादी संघटनेचा नेता म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५० गुन्ह्यांची त्याच्या नावावर नोंद होती.या कारवाईत त्याच्यासह त्याची पत्नी समक्कादेखील ठार झाल्याचे वृत्त आहे. या कारवाईत पोलिसांनी १ एके-४७, १ एसएलआर व ५ रायफली जप्त केल्या.>दोघांची ओळख पटलीठार करण्यात आलेल्या १०पैकी संजीव आणि महिला पेड्डा बुद्री यांची ओळख पटली असून, दोघेही या संघटनेत सक्रिय सहभागी असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी अनेक भागांत सुरक्षादलाच्या जवानांना लक्ष्य केले होते. दंतेवाडा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ पोलीस जखमीदेखील झाले होते. या पार्श्वभूमीवर नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. ही चकमक बनावट असल्याचा आरोप क्रांतिकारी लेखक संघटनेचे वारवरा राव यांनी केला आहे. पोलिसांनी माओवाद्यांना पकडले, त्यांचे हाल केले व नंतर त्यांना ठार केले़ तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राव यांनी केली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी