शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक रेल्वेला १० तास उशीर, मजुरांचे हाल; रेल्वे रुळांवर उतरून केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 23:50 IST

निकृष्टजेवण दिल्याची तक्रार

लखनऊ : देशातील विविध ठिकाणांहून स्थलांतरित मजुरांना घेऊन उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सुमारे १० तास उशिराने धावत असल्याच्या व त्यामुळे अन्नपाण्याविना मजुरांचे विलक्षण हाल झाल्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांत घडले आहेत. त्यामुळे या मजुरांनी रेल्वेगाडीतून रूळांवर उतरून केंद्र व नीतीशकुमार सरकारचा जोरदार निषेध केला. रेल्वे यंत्रणेने शिळे अन्न खायला दिल्याच्या तक्रारीही त्यांच्यापैकी अनेकांनी केल्या आहेत.

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील स्थलांतरित मजुरांना घेऊन निघालेली श्रमिक विशेष रेल्वेगाडी उत्तर प्रदेशमधील दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्थानकाजवळ आली व तिथे सुमारे दहा तास थांबून राहिली. गाडी पुढे सरकत नसल्यामुळे त्यातील प्रवासी बेचैन झाले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचे तर खूपच हाल झाले. घरी लवकर पोहोचायची आस या सर्वांना लागलेली होती. त्यात हे संकट उद्भवल्याने रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काही मजूर रेल्वेरुळावर उतरले व त्यांनी जोरदार निदर्शने केली.

आंध्र प्रदेशमधून आलेल्या श्रमिक विशेष गाडीतून प्रवास करणारा एक मजूर धीरेन राय यांनी सांगितले की, ही रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री अकरा वाजता दीनदयाळ उपाध्याय रेल्वे जंक्शनच्या जवळ येऊन उभी राहिली. या गाडीतून प्रवास करताना दोन दिवसांपासून आम्हाला व्यवस्थित जेवणही मिळालेले नाही. श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रत्येकमजुराकडून १५०० रुपये शुल्क घेण्यात आले आहे.महाराष्ट्रातील पनवेलहून उत्तर प्रदेशच्या जौनपूरला निघालेली श्रमिकविशेष रेल्वेगाडी वाराणसीजवळ १० तास थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेले मजूर निदर्शने करण्यासाठी रेल्वे रुळांवर उतरले.

दुसºया रेल्वेगाडीने त्यांना पुढच्या प्रवासाला नेण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दाखविली. पण त्याला या मजुरांनी नकार दिला. सरतेशेवटी रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत या प्रवाशांना शांत केले. त्यांना जेवायला दिले. त्यातील एक प्रवासी गोविंद कुमार राजभर यांनी सांगितले की, श्रमिक विशेष गाडीने महाराष्ट्रातून निघालो तेव्हा आम्हाला जेवण देण्यात आले होते. पण उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करताच आमचे अन्नपाण्यावाचून हाल झाले. वाराणसी येथे श्रमिक विशेष गाडी सात तास थांबविण्यात आली. मग गाडी आणखी पुढे नेऊन अजून अडीच ते पावणेतीन तास थांबविली गेली. गुजरातमधून बिहारकडे निघालेल्या श्रमिक विशेष रेल्वेगाडीतील प्रवाशांना शुक्रवारी रात्री शिळेपाके अन्न रेल्वे यंत्रणेने दिल्याचा आरोप स्थलांतरित मजुरांनी केला आहे.

उन्नावमध्ये खिडक्यांच्या काचा फोडल्या

विविध ठिकाणांहून उत्तर प्रदेश, बिहारकडे निघालेल्या श्रमिक रेल्वेगाड्यांच्या प्रसाधनगृहांमध्ये पाणी नव्हते. पिण्याचे पाणी मिळणे तर स्वप्नवतच होते. रेल्वे यंत्रणेकडून पुरविण्यात आलेल्या जेवणातील पुºया शिळ्या होत्या. दोन-तीन दिवसांपूर्वी या पुºया तळल्या असाव्यात असा त्यांचा थाट होता. बंगळुरू येथून बिहारमध्ये श्रमिक विशेष रेल्वेगाडीने चाललेल्या मजुरांनी जेवण न मिळाल्यामुळे संतापून उन्नाव रेल्वे स्थानकाच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत १८.२४ लाख मजूर आपल्या राज्यात परतले आहेत, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे