शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:40 IST

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पाटणा - बिहारच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप पाहिला मिळाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदसोबतची युती तोडून पुन्हा भाजपासोबत घरोबा केला. त्यानंतर, पुन्हा एकदा भाजपा-जयदू युतीचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, बहुमत चाचणीही सिद्ध करुन सरकार स्थीर असल्याचं दाखवून दिलं. मात्र, यावेळी, आमदारांची फोडाफोडी करत खेरदी झाल्याचा आरोप नितीश कुमार यांच्यावर विरोधकांकडून होत आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पक्षातील सहकारी आमदार संजीव कुमार यांनी भाजपाच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करण्याची विचारणा केली होती. तसेच, मला मोठी रक्कम देण्याची आणि कॅबिनेटमध्ये संधी देण्याचंही आमिष दाखवलं होतं, असे सुधांशू शेखर यांनी म्हटलं आहे. 

बहुमत चाचणी सिद्ध करण्यापूर्वी सत्ताधारी जदयू पक्षाकडून आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे पक्षातूनच हा कट रचण्यात येत होता. याप्रकरणी, मंगळवारी जदयू आमदार सुधांशू शेखर यांनी पाटणा येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यामध्ये, मला बहुमत चाचणीपूर्वी राजदच्या महाआघाडीत जाण्यासाठी १० कोटी रुपये लाच आणि कॅबिनेट मंत्रीपदाचे आमिष दाखवण्यात आले होते, असे म्हटले आहे. सुधांशू शेखर हे मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी मतदारसंघातून जदयूचे आमदार आहेत. 

पाटणाचे पोलीस अधीक्षक कृष्ण मुरारी प्रसाद यांनी याबाबत म्हटले की, सुधांशू शेखर यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार संजीव कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ११ फेब्रुवारी रोजी शेखर यांनी ही फिर्याद दिली आहे. याप्रकरणी, भादंविनुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरू केल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं. 

राजदचे तीन आमदार फुटले, अशी ही पळवापळवी

बिहारमधील नितीश सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. राजदच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिल्याने ठरावाच्या बाजूने १२९, तर विरोधात शून्य मते पडली. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. दरम्यान, यावेळी राजदने जदयूचे ५ व भाजपचे ३ आमदार गळाला लावले. १२२ मतांचा आकडा गाठणे भाजप-जदयूसाठी कठीण होते. प्रभारी विनोद तावडे यांनी सूत्रे हाती घेतली. जयदूचे ३ आमदार परत आणले व राजदच्या ३ आमदारांनाही गोटात आणले. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटविण्याच्या वेळी सरकारच्या बाजूने १२५ मतेच पडली होती.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूकNitish Kumarनितीश कुमारMLAआमदारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड