शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:40 IST

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पाटणा - बिहारच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप पाहिला मिळाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदसोबतची युती तोडून पुन्हा भाजपासोबत घरोबा केला. त्यानंतर, पुन्हा एकदा भाजपा-जयदू युतीचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, बहुमत चाचणीही सिद्ध करुन सरकार स्थीर असल्याचं दाखवून दिलं. मात्र, यावेळी, आमदारांची फोडाफोडी करत खेरदी झाल्याचा आरोप नितीश कुमार यांच्यावर विरोधकांकडून होत आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पक्षातील सहकारी आमदार संजीव कुमार यांनी भाजपाच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करण्याची विचारणा केली होती. तसेच, मला मोठी रक्कम देण्याची आणि कॅबिनेटमध्ये संधी देण्याचंही आमिष दाखवलं होतं, असे सुधांशू शेखर यांनी म्हटलं आहे. 

बहुमत चाचणी सिद्ध करण्यापूर्वी सत्ताधारी जदयू पक्षाकडून आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे पक्षातूनच हा कट रचण्यात येत होता. याप्रकरणी, मंगळवारी जदयू आमदार सुधांशू शेखर यांनी पाटणा येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यामध्ये, मला बहुमत चाचणीपूर्वी राजदच्या महाआघाडीत जाण्यासाठी १० कोटी रुपये लाच आणि कॅबिनेट मंत्रीपदाचे आमिष दाखवण्यात आले होते, असे म्हटले आहे. सुधांशू शेखर हे मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी मतदारसंघातून जदयूचे आमदार आहेत. 

पाटणाचे पोलीस अधीक्षक कृष्ण मुरारी प्रसाद यांनी याबाबत म्हटले की, सुधांशू शेखर यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार संजीव कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ११ फेब्रुवारी रोजी शेखर यांनी ही फिर्याद दिली आहे. याप्रकरणी, भादंविनुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरू केल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं. 

राजदचे तीन आमदार फुटले, अशी ही पळवापळवी

बिहारमधील नितीश सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. राजदच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिल्याने ठरावाच्या बाजूने १२९, तर विरोधात शून्य मते पडली. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. दरम्यान, यावेळी राजदने जदयूचे ५ व भाजपचे ३ आमदार गळाला लावले. १२२ मतांचा आकडा गाठणे भाजप-जदयूसाठी कठीण होते. प्रभारी विनोद तावडे यांनी सूत्रे हाती घेतली. जयदूचे ३ आमदार परत आणले व राजदच्या ३ आमदारांनाही गोटात आणले. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटविण्याच्या वेळी सरकारच्या बाजूने १२५ मतेच पडली होती.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूकNitish Kumarनितीश कुमारMLAआमदारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड