शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:40 IST

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पाटणा - बिहारच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप पाहिला मिळाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदसोबतची युती तोडून पुन्हा भाजपासोबत घरोबा केला. त्यानंतर, पुन्हा एकदा भाजपा-जयदू युतीचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, बहुमत चाचणीही सिद्ध करुन सरकार स्थीर असल्याचं दाखवून दिलं. मात्र, यावेळी, आमदारांची फोडाफोडी करत खेरदी झाल्याचा आरोप नितीश कुमार यांच्यावर विरोधकांकडून होत आहे. नितीश कुमार यांच्या पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पक्षातील सहकारी आमदार संजीव कुमार यांनी भाजपाच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करण्याची विचारणा केली होती. तसेच, मला मोठी रक्कम देण्याची आणि कॅबिनेटमध्ये संधी देण्याचंही आमिष दाखवलं होतं, असे सुधांशू शेखर यांनी म्हटलं आहे. 

बहुमत चाचणी सिद्ध करण्यापूर्वी सत्ताधारी जदयू पक्षाकडून आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे पक्षातूनच हा कट रचण्यात येत होता. याप्रकरणी, मंगळवारी जदयू आमदार सुधांशू शेखर यांनी पाटणा येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यामध्ये, मला बहुमत चाचणीपूर्वी राजदच्या महाआघाडीत जाण्यासाठी १० कोटी रुपये लाच आणि कॅबिनेट मंत्रीपदाचे आमिष दाखवण्यात आले होते, असे म्हटले आहे. सुधांशू शेखर हे मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी मतदारसंघातून जदयूचे आमदार आहेत. 

पाटणाचे पोलीस अधीक्षक कृष्ण मुरारी प्रसाद यांनी याबाबत म्हटले की, सुधांशू शेखर यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार संजीव कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ११ फेब्रुवारी रोजी शेखर यांनी ही फिर्याद दिली आहे. याप्रकरणी, भादंविनुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरू केल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं. 

राजदचे तीन आमदार फुटले, अशी ही पळवापळवी

बिहारमधील नितीश सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. राजदच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिल्याने ठरावाच्या बाजूने १२९, तर विरोधात शून्य मते पडली. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. दरम्यान, यावेळी राजदने जदयूचे ५ व भाजपचे ३ आमदार गळाला लावले. १२२ मतांचा आकडा गाठणे भाजप-जदयूसाठी कठीण होते. प्रभारी विनोद तावडे यांनी सूत्रे हाती घेतली. जयदूचे ३ आमदार परत आणले व राजदच्या ३ आमदारांनाही गोटात आणले. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटविण्याच्या वेळी सरकारच्या बाजूने १२५ मतेच पडली होती.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूकNitish Kumarनितीश कुमारMLAआमदारJanta Dal Unitedजनता दल युनायटेड