शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

वाहतूक कोंडीची जगातील १० पैकी ४ शहरे भारतात, टॉमटॉमचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:37 IST

टॉमटॉम ही आघाडीची ई-व्हेईकल नेव्हिगेशन कंपनी.

गुवाहाटी : वाहतूक कोंडीचा अत्यंत वाईट फटका बसणारा देश आहे भारत. टॉमटॉमच्या माहितीनुसार जगात कमालीची वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या १० पैकी चार शहरे (बंगळुरू, पुणे, दिल्ली आणि मुंबई) ही भारतातील आहेत. वाहतूक कोंडीमुळे तासन्तास कारमध्ये बसून राहणे सगळ्यांना नकोसे झाले आहे; परंतु वर्षामागून वर्षे जगातील महत्त्वाच्या शहरांत वाहतुकीचा व वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे. कारण गेल्या दहा वर्षांत वाहनांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे. अमेरिका किंवा चीनमध्ये जेवढ्या कार विकल्या जातात त्यापेक्षा त्या भारतात कमी विकल्या जात असल्या तरी वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त त्रास भारतीयांना सहन करावा लागतो आहे.

टॉमटॉम ही आघाडीची ई-व्हेईकल नेव्हिगेशन कंपनी. तिने सहा खंडांतील ५७ देशांत ४१६ शहरांत पाहणी करून वार्षिक वाहतूक निर्देशांक (अ‍ॅन्युएल ट्रॅफिक इंडेक्स) जारी केला. कंपनीचे हे नववे वर्ष असून, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स जगात शहरी भागांत वाहतुकीची कोंडी नेमकी कोणत्या वेळी होते व वाहतूक कोंडीचा इतिहास उपलब्ध करून देतो. भारतातील माहिती व तंत्रज्ञान केंद्र बंगळुरू शहर जगात वाहतूक कोंडीसाठी कुख्यात आहे. तेथे वाहतूक कोंडी सर्वात जास्त ७१ टक्के आहे. २० आॅगस्ट, २०१९ हा (मंगळवार) दिवस सर्वात वाईट ठरला. त्या दिवशी १०३ टक्के वाहतूक कोंडी होती.

६ एप्रिल (शनिवार) रोजी ती फक्त ३० टक्के होती. अहवालात म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री आठनंतर प्रवास केल्यास तुमचे वर्षाला पाच तास वाचू शकतात. वाहतूक कोंडीमुळे सरासरी २४३ तास (१० दिवस, तीन तास) वाया जातात. बंगळुरूनंतर मनिला (फिलिपिन्स) शहरात ७१ टक्के वाहतूक कोंडी आहे. जगात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होणाºया पाच शहरांत मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. त्यांचा क्रम अनुक्रमे चौथा व पाचवा आहे. कोलंबियातील बोगोटाचे स्थान तिसरे आहे. दिल्लीचा क्रमांक आठवा, तर मॉस्को (रशिया), लिमा (पेरू), इस्तंबूल (टर्की) आणि जकार्ता (इंडोनेशिया) हे अनुक्रमे सहा, सात, नऊ आणि दहाव्या पायरीवर आहेत.अशी ठरते टक्केवारी- वाहतूक कोंडीच्या टक्केवारीचा नेमका अर्थ असा. उदा. बँकॉकमध्ये वाहतूक कोंडी ५३ टक्के पातळीची असेल, तर त्याचा अर्थ असा की, बँकॉकमधील वाहतूक कोंडी नसलेल्या परिस्थितीचा (बेसलाईन) आधार घेतल्यास प्रवासाला ५३ टक्के जास्त वेळ लागतो. टॉमटॉम प्रत्येक शहरात बेसलाईनचे गणित मांडते.- वर्षात ३६५ दिवसांत संपूर्ण रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना सहजगत्या जाता- येता येईल त्या वेळेचे विश्लेषण करून बेसलाईन ठरवते. ही डच कंपनी शहरांचा दर्जा प्रवासाला सरासरी जास्तीचा वेळ किती लागला यावरून ठरवते.- कोणत्या वेळी वाहतूक कोंडी सर्वात जास्त व सर्वात कमी होती आणि वाहनचालकांना पुढचे वाहन सरकण्यासाठी किती वेळ वाया घालवावा लागला हेदेखील विचारात घेतले जाते.- मुंबईत ९ सप्टेंबर, २०१९ रोजी ६५ टक्के वाहतूक कोंडी होती. हा दिवस सगळ्यात वाईट होता. मुंबईकरांनी सरासरी २०९ तास वाहतूक कोंडीत गमावले. २ आॅगस्ट, २०१९ रोजी पुण्यात ५९ टक्के वाहतूक कोंडी होती व हा दिवस त्याच्यासाठी वाईट ठरला.- या कोंडीमुळे पुणेकरांनी १९३ तास गमावले. दिल्लीत ५६ टक्के वाहतूक कोंडी आहे. २३ आॅक्टोबर, २०१९ हा दिवस राजधानीसाठी वाईट ठरला. त्या दिवशी १९० तास वाहनचालकांना गमवावे लागले.- भारतातील चार शहरांत सर्वात जास्त कार्स या दिल्लीत आहेत. या आधीच्या अभ्यासात भारतातील मेट्रो शहरांमध्ये दिल्लीतील रस्त्यांची अवस्था चांगली असल्याचा निष्कर्ष निघाला होता.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी