शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेसचे १० ते १२ आमदार राजीनामा देणार?; भाजपाच्या खेळीने राजकारण तापणार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 08:43 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात.

ठळक मुद्देसंख्याबळ पाहता सत्ताधारी भाजपा राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर जिंकू शकतेमध्य प्रदेशपाठोपाठ गुजरातमध्ये काँग्रेसला झटका आतापर्यंत ५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत

अहमदाबाद - मध्यप्रदेश पाठोपाठ काँग्रेसलागुजरातमध्येही झटका बसला आहे. गुजरातकाँग्रेसच्या चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये काँग्रेसच्या ५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. 

विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणाऱ्यांच्या नावाचा खुलासा अद्याप झाला नाही. गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या ४ आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात. निवडणुकीपूर्वी हे दोन्ही आमदार गायब झाले असून काँग्रेसच्या संपर्कातही नाही. त्याचसोबत मंगल गावित आणि प्रद्युमन सिंह जाडेजा यांनी राजीनामा दिला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर काँग्रेस आमदार प्रविण मारु यांनी राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. राजीनामा दिलेले ते पहिले आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच मी राजीनामा दिला होता असा दावा प्रविण मारु यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुजरातमध्ये योग्य खबरदारी घेतली आहे. शनिवारी काँग्रेसने १४ आमदारांना जयपूरला हलवलं आहे. गुजरातचे आमदार जयपूरमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. 

५ आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार ५ आमदारांसह अन्य १० ते १२ आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. 

संख्याबळ पाहता सत्ताधारी भाजपा राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर सहज जिंकू शकते. त्याहून जास्त जागांसाठी त्यांना इतरांची मदत लागेल किंवा विरोधकांची मते कमी व्हावी लागतील. हे राजीनामे त्याच रणनीताचा भाग असावा, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. यामुळे १८२ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या ६९वर आली. हे राजीनामे मी मंजूर केले आहेत. त्यांची नावे मी आज विधानसभेत जाहीर करीन, असे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले आहे. विधानसभेत राज्यसभेसाठी मतदान २६ मार्च रोजी होणार आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसGujaratगुजरातRajya Sabhaराज्यसभा