शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
2
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
3
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
4
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
5
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
6
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
7
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
8
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
9
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
10
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
11
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
12
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
13
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
14
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
15
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
16
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
17
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
18
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
19
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
20
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ

ट्रेन्सची संख्या वाढते आहे तरीही रेल्वेत १ लाख २२ हजार पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 8:39 PM

भारतात प्रतिवर्षी नव्या ट्रेन्सची संख्या वाढते आहे तरीही एप्रिल २0१६ च्या स्थितीनुसार लोको पायलट, सहायक लोको पायलट, गार्ड, गँगमन, पॉइंट मन, स्टेशन मास्तर अशा प्रवर्गातील एकुण १ लाख २२ हजार ७८३ पदे रिक्त आहेत

सुरेश भटेवरानवी दिल्ली : भारतात प्रतिवर्षी नव्या ट्रेन्सची संख्या वाढते आहे तरीही एप्रिल २0१६ च्या स्थितीनुसार लोको पायलट, सहायक लोको पायलट, गार्ड, गँगमन, पॉइंट मन, स्टेशन मास्तर अशा प्रवर्गातील एकुण १ लाख २२ हजार ७८३ पदे रिक्त आहेत. परिणामी कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा भार, प्रवाशांचा सुरक्षित प्रवास, रेल्वेच्या अपघातांबाबत सतर्कता इत्यादी विषयांबाबत चिंता करावी अशी स्थिती आहे. रेल्वे संसदीय स्थायी समितीचा जो अहवाल संसदेत सादर झाला, त्यात या गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.भारतीय रेल्वेत जवळपास सव्वा लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे बºयाच कर्मचाºयांना सलग २0 तास काम करावे लागते. कामाचा वाढलेला भार, थकवा, तणाव इत्यादींमुळे रेल्वे वाहतुकीत उच्चस्तराची दक्षता ठेवणे अनेकदा अशक्य होते. रेल्वे अपघातांना निमंत्रण देणारीच ही स्थिती असल्याने रेल्वे प्रवाशांची सुरक्षा संकटात आहे. एप्रिल २0१६ च्या आकडेवारीनुसार रेल्वेची एकुण मंजूर पदे ७ लाख ४६ हजार ६७६ आहेत. प्रत्यक्षात या पदांवर फक्त ६ लाख २३ हजार ९१३ लोक काम करीत आहेत. याचा अर्थ भारतीय रेल्वेत १ लाख २२ हजार ७८३ पदे रिक्त आहेत, निश्चितच ही बाब चिंताजनक व गंभीर स्वरूपाची आहे, असे स्थायी समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.रेल्वे अधिनियम १९८९ नुसार रेल्वे कर्मचाºयांचे कामाचे तास १0 पेक्षा अधिक असू नयेत असे नमूद आहे. लोहमार्गाचे रूळ इत्यादींमधे अनेकदा तूटफूट संभवते. त्यांच्या त्वरित दुरूस्तीत गँगमनची भूमिका अत्यंत महत्वाची असते. सध्या रेल्वेकडे पुरेसे गँगमन नाहीत, ही लक्षवेधी बाब या अहवालाव्दारे प्रकाशात आली आहे. ट्रेन प्रवासाचे सुरक्षित व सतर्क संचालन एक अवघड जबाबदारी आहे. लोको पायलट ती सांभाळतात. प्रवासाच्या प्रत्येक किलोमीटरवर सिग्नल यंत्रणेवर त्यांना लक्ष ठेवावे लागते. १00 कि.मी.अंतराच्या प्रवासात १00 वेळा बाहेर डोकवावे लागते. पुरेसे लोको पायलट नसल्याने बºयाच लोको पायलटना सलग ४ ते ५ दिवस काम करावे लागते. त्यांच्याकडून जराशी देखी चूक झाली तर अनेक प्रवाशांचे आयुष्य संकटात सापडू शकते. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या स्थायी समितीने रेल्वे भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ट्रेन्सच्या वाढत्या संख्येनुसार काही प्रमाणात रेल्वेत नवी भरती झाली मात्र ती पुरेशी नाही. गेल्या ४ वर्षांपासून रिक्त पदे भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही झालेली नाही, असे नमूद करीत आगामी वर्षात रेल्वेच्या सेवेतून किती कर्मचारी निवृत्त होणार आहेत, याचे निर्दोष आकलन करून रेल्वेची नोकर भरती व्हायला हवी, अशी सूचना स्थायी समितीने केली आहे.