०६... कामठी... अविश्वास
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:21+5:302015-07-06T23:34:21+5:30
सरपंच बावणे पायउतार

०६... कामठी... अविश्वास
स पंच बावणे पायउतार रनाळा ग्रामपंचायत : अविश्वास प्रस्ताव पारितकामठी : गैरव्यवहाराचा ठपका ठेवत कामठी तालुक्यातील रनाळा येथील सरपंच सीमा सतीश बावणे यांच्या विरोधात सात विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यामुळे बावणे यांना अखेर पायउतार व्हावे लागले. रनाळा ग्रामपंचायतची एकूण सदस्यसंख्या नऊ आहे. यातील सात सदस्यांनी बावणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रनाळा ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजता विशेष सभा बोलावण्यात आली होती.या बैठकीला सरपंच सीमा बावणे आणि ग्रामपंचायत सदस्य वैशाली उईके अनुपस्थित होत्या. शिवाय, उपसरपंच सुधीर अपाले, ग्रामपंचायत सदस्य नरेश चकोले, अरविंद डोंगरे, शेषराव मोहोड, रंजना वंजारी, अंकिता तळेकर, भारती धानोरकर आदी सात सदस्यांनी सभेला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे, या सातही सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सभेला सुरुवात होताच अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यात हा प्रस्ताव सात विरुद्ध शून्य मतांनी पारित करण्यात आला.विकास कामांमध्ये तसेच महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, रनाळा येथील ताजश्री मतिमंद मुलांच्या शाळेला नियमबाह्य पद्धतीने नाहरकत प्रमाणपत्र देणे, ग्रामपंचायतच्या मासिक सभेत चुकीचे ठराव पारित करणे, त्यातून ग्रामपंचायतचे आर्थिक नुकसान करणे, ठराव पारित करताना सदस्यांना विश्वासात न घेणे, विकास कामांची देयके देण्यास टाळाटाळ करणे आदी आरोप करण्यात आले. या ग्रामपंचायतवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपमध्ये दोन गट पडले असून, वर्चस्वाच्या लढाईत अविश्वास घेण्यात आल्याची माहिती स्थानिक जाणकारांनी दिली. यासंदर्भात सीमा बावणे म्हणाल्या, या गैरव्यवहाराला आपण एकटे जबाबदार नाही. जेही निर्णय घेण्यात आले, ते सर्वांच्या संमतीने घेण्यात आले. त्यामुळे आपण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)***