शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राजकीय पक्षांनी कसली कंबर! निवडणुकांचा मांडला डाव; मतदारांच्या मनाचा लागेना ठाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:58 IST

पेठ - आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पेठ तालुक्यातील कोहोर गटातून सर्वच राजकीय पक्षांनी ...

पेठ - आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पेठ तालुक्यातील कोहोर गटातून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असली तरी मतदारांच्या मनात नेमकं काय आहे याचा ठाव मात्र कोणालाच घेता येऊ शकत नाही.

कोहोर गट तसा निवडणुकांमध्ये चमत्कार घडवून आणणारा गट आहे. यापूर्वीच्या निवडणुकांवर प्रकाशझोत टाकताना याच गटातून कॉंग्रेसचे कोंडाजी मामा आव्हाड यांच्या पत्नी निवडून आल्या होत्या. त्यानंतर मात्र याच गटातून प्रमोद मोरे यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नव्यानेच स्थापन झालेल्या मनसेचे सुधाकर राऊत यांना मतदारांनी पसंती देत जिल्हा परिषद सदस्य बनवले. नंतरच्या काळात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेचे भास्कर गावित यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले. सध्या शिवसेनेच्या हेमलता गावित या कोहोर गटाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कोहोर गटात करंजाळी व कोहोर असे दोन गण असून दोन्ही गणांवर शिवसेनेची सत्ता आहे. आगामी काळात गट व गणांच्या पुनर्रचनेबाबत तालुक्यात संभ्रमवस्था असून त्याचाही अंदाज सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे मातब्बर इच्छुक रिंगणात राहतील, असे दिसून येते. यामध्ये आजी-माजी आमदार पुत्रासह आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पक्षांचे तालुका प्रमुख एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेकडून भास्कर गावित पुन्हा एकदा कोहोर गटाची निवडणूक लढवतात का? त्यांचे पुत्र शामराव गावित किंवा करंजाळीचे नंदू गवळी यांना संधी देतात, यावर शिवसेनेच्या गोटात खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी कोहार गटात संपर्क वाढवला आहे. नरहरी झिरवाळ यांचेसह गोकूळ झिरवाळ यांची करंजाळी सासूरवाडी असल्याने तसेच गोकूळ झिरवाळ यांनी कोहोर गटावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याने त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण