शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

युवक आणि महिलांना मिळाली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:59 IST

आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यता देऊन प्रामाणिकपणे प्रचार करीत असत. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने महिला व तरुणांना उमेदवारीची संधी दिली होती.

ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक

आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यता देऊन प्रामाणिकपणे प्रचार करीत असत. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने महिला व तरुणांना उमेदवारीची संधी दिली होती.साधारणत: २५ ते ३० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी, विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने अ‍ॅड. विलास लोणारी यांना उमेदवारी मिळाल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. पूर्वीच्या काळी कोणतीही निवडणूक असो कार्यकर्त्यांची फळी तयार असे. कोणत्याही कार्यकर्त्याला आमंत्रण द्यावे लागत नव्हते. सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून नाशिकमधून लोणारी निवडून आले होते. कारण कार्यकर्ते त्यांचा अथकपणे प्रचार करीत होते. आताच्या काळात मात्र बंडखोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. सर्व पक्षांत बंडखोरी करीत या पक्षातून त्या पक्षात उडी घेत आहेत. जसे काही वाहन बदलतात त्याप्रमाणे आजकाल लोक पक्ष बदलत आहेत. पूर्वीच्या काळी नेत्यांच्या शब्दांना मोल होते. वचनबद्धता पाळली जात असे. त्या काळात काँग्रेस पक्षाने अनेक महिलांना संधी दिली होती. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आमदार म्हणून कार्य केले आहे. तसेच बीडमधून केशरबाई क्षीरसागर, दाभाडीतून पुष्पाताई हिरे, सिन्नरमधून वाजेताई, नाशिकमधून शोभा बच्छाव यांनी विधानसभेत आमदार व त्यानंतर मंत्रिपददेखील भूषविले आहे. मलादेखील नाशिकमध्ये उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा बँकेचे अध्यक्षपददेखील मी भूषविले आहे. पक्षातील आणि कार्यकर्त्यांच्या बळावर महिलांना आणि तरुणांना राजकारणात संधी मिळू शकते, हे मी अनुभवातून सांगते. फक्त त्यासाठी काम करण्याची जिद्द आणि संयम हवा.-सुमनताई बागले

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक