शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
5
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
6
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
7
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
8
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
9
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
10
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
11
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
12
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
13
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
14
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
15
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
16
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
17
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
18
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
19
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
20
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."

अनुकंपा नोकरीसाठी आलेले युवक माघारी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:39 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देटाळाटाळ : वर्षोनुवर्षे खेटा घालूनही पदरी निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून खेटा मारणाऱ्या युवकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, नोकरीचे नियुक्तिपत्र देऊ, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. परंतु आचारसंहिता मागे होऊन आठवड्याचा कालावधी उलटल्याने प्रशासनाकडे विचारणा करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो बेरोजगार युवकांना वरिष्ठ अधिकारी न भेटल्याने माघारी फिरावे लागले.

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर भरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पालकाच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी शेकडो युवक पाठपुरावा करत असून, त्यांची संख्या जवळपास २७६च्या आसपास आहे. त्यांच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश मिळाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यासाठी पावले उचलली आहेत. साधारणत: दीडशे युवकांचे शैक्षणिक कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु मार्च महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने ही प्रक्रिया मागे पडली. अडीच ते तीन महिने त्यावर काहीच हालचाल होऊ शकली नसली तरी, या युवकांनी आपली मागणी रेटून धरली असता, प्रशासनाने आचारसंहिता संपुष्टात आल्यावर त्याच आठवड्यात नियुक्तीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिले. या भरतीत ग्रामसेवक, शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, तांत्रिक असे अनेक पदे असून, मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ११० युवकांना नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मकता प्रशासनाने दर्शविली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येऊन आठवड्याचा कालावधी उलटला असून, ३१ मेपर्यंत नियुक्तीची पत्रे मिळतील असा अंदाज या युवकांनी बांधला होता. परंतु तसे काही न झाल्याने सोमवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो युवक-युवती जिल्हा परिषदेत जमली होती. मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या समुपदेशाने बदल्यांची कार्यवाही सुरू असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह सर्व वरिष्ठ अधिकारी दिवसभर त्यात व्यस्त होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाट पाहूनही या अधिकाºयांची भेट न झाल्याने अखेर या युवकांनी माघारी फिरणे पसंत केले.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद