शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा नोकरीसाठी आलेले युवक माघारी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:39 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देटाळाटाळ : वर्षोनुवर्षे खेटा घालूनही पदरी निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून खेटा मारणाऱ्या युवकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, नोकरीचे नियुक्तिपत्र देऊ, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. परंतु आचारसंहिता मागे होऊन आठवड्याचा कालावधी उलटल्याने प्रशासनाकडे विचारणा करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो बेरोजगार युवकांना वरिष्ठ अधिकारी न भेटल्याने माघारी फिरावे लागले.

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर भरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पालकाच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी शेकडो युवक पाठपुरावा करत असून, त्यांची संख्या जवळपास २७६च्या आसपास आहे. त्यांच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश मिळाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यासाठी पावले उचलली आहेत. साधारणत: दीडशे युवकांचे शैक्षणिक कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु मार्च महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने ही प्रक्रिया मागे पडली. अडीच ते तीन महिने त्यावर काहीच हालचाल होऊ शकली नसली तरी, या युवकांनी आपली मागणी रेटून धरली असता, प्रशासनाने आचारसंहिता संपुष्टात आल्यावर त्याच आठवड्यात नियुक्तीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिले. या भरतीत ग्रामसेवक, शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, तांत्रिक असे अनेक पदे असून, मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ११० युवकांना नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मकता प्रशासनाने दर्शविली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येऊन आठवड्याचा कालावधी उलटला असून, ३१ मेपर्यंत नियुक्तीची पत्रे मिळतील असा अंदाज या युवकांनी बांधला होता. परंतु तसे काही न झाल्याने सोमवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो युवक-युवती जिल्हा परिषदेत जमली होती. मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या समुपदेशाने बदल्यांची कार्यवाही सुरू असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह सर्व वरिष्ठ अधिकारी दिवसभर त्यात व्यस्त होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाट पाहूनही या अधिकाºयांची भेट न झाल्याने अखेर या युवकांनी माघारी फिरणे पसंत केले.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद