शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

अनुकंपा नोकरीसाठी आलेले युवक माघारी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:39 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देटाळाटाळ : वर्षोनुवर्षे खेटा घालूनही पदरी निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून खेटा मारणाऱ्या युवकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, नोकरीचे नियुक्तिपत्र देऊ, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. परंतु आचारसंहिता मागे होऊन आठवड्याचा कालावधी उलटल्याने प्रशासनाकडे विचारणा करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो बेरोजगार युवकांना वरिष्ठ अधिकारी न भेटल्याने माघारी फिरावे लागले.

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर भरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पालकाच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी शेकडो युवक पाठपुरावा करत असून, त्यांची संख्या जवळपास २७६च्या आसपास आहे. त्यांच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश मिळाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यासाठी पावले उचलली आहेत. साधारणत: दीडशे युवकांचे शैक्षणिक कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु मार्च महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने ही प्रक्रिया मागे पडली. अडीच ते तीन महिने त्यावर काहीच हालचाल होऊ शकली नसली तरी, या युवकांनी आपली मागणी रेटून धरली असता, प्रशासनाने आचारसंहिता संपुष्टात आल्यावर त्याच आठवड्यात नियुक्तीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिले. या भरतीत ग्रामसेवक, शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, तांत्रिक असे अनेक पदे असून, मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ११० युवकांना नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मकता प्रशासनाने दर्शविली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येऊन आठवड्याचा कालावधी उलटला असून, ३१ मेपर्यंत नियुक्तीची पत्रे मिळतील असा अंदाज या युवकांनी बांधला होता. परंतु तसे काही न झाल्याने सोमवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो युवक-युवती जिल्हा परिषदेत जमली होती. मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या समुपदेशाने बदल्यांची कार्यवाही सुरू असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह सर्व वरिष्ठ अधिकारी दिवसभर त्यात व्यस्त होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाट पाहूनही या अधिकाºयांची भेट न झाल्याने अखेर या युवकांनी माघारी फिरणे पसंत केले.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद