शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
3
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
4
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
5
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
6
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
7
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
8
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
9
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
10
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
11
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
12
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
13
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
14
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
16
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
17
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
18
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
19
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
20
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा नोकरीसाठी आलेले युवक माघारी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:39 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देटाळाटाळ : वर्षोनुवर्षे खेटा घालूनही पदरी निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून खेटा मारणाऱ्या युवकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, नोकरीचे नियुक्तिपत्र देऊ, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. परंतु आचारसंहिता मागे होऊन आठवड्याचा कालावधी उलटल्याने प्रशासनाकडे विचारणा करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो बेरोजगार युवकांना वरिष्ठ अधिकारी न भेटल्याने माघारी फिरावे लागले.

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशाही शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर भरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पालकाच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी शेकडो युवक पाठपुरावा करत असून, त्यांची संख्या जवळपास २७६च्या आसपास आहे. त्यांच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश मिळाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यासाठी पावले उचलली आहेत. साधारणत: दीडशे युवकांचे शैक्षणिक कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु मार्च महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने ही प्रक्रिया मागे पडली. अडीच ते तीन महिने त्यावर काहीच हालचाल होऊ शकली नसली तरी, या युवकांनी आपली मागणी रेटून धरली असता, प्रशासनाने आचारसंहिता संपुष्टात आल्यावर त्याच आठवड्यात नियुक्तीचे आदेश काढण्याचे आश्वासन दिले. या भरतीत ग्रामसेवक, शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, तांत्रिक असे अनेक पदे असून, मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ११० युवकांना नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मकता प्रशासनाने दर्शविली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येऊन आठवड्याचा कालावधी उलटला असून, ३१ मेपर्यंत नियुक्तीची पत्रे मिळतील असा अंदाज या युवकांनी बांधला होता. परंतु तसे काही न झाल्याने सोमवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो युवक-युवती जिल्हा परिषदेत जमली होती. मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या समुपदेशाने बदल्यांची कार्यवाही सुरू असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह सर्व वरिष्ठ अधिकारी दिवसभर त्यात व्यस्त होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत वाट पाहूनही या अधिकाºयांची भेट न झाल्याने अखेर या युवकांनी माघारी फिरणे पसंत केले.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद