येवलेकरांना पाणीपीत २५ टक्के दरवाढीचा झटका जोड
By Admin | Updated: May 5, 2014 19:10 IST2014-05-05T17:39:00+5:302014-05-05T19:10:52+5:30
पालखेडची थकबाकी!

येवलेकरांना पाणीपीत २५ टक्के दरवाढीचा झटका जोड
पालखेडची थकबाकी!
पालिकेत ठेकेदारांची बिले काढण्याची तत्परता ज्या पद्धतीने दाखविली जाते, तितक्याच तत्परतेने पालखेड पाटबंधारे विभागाची, डाव्या कालव्यामार्फत होणार्या बिगर सिंचन पाणीपुरवठ्याची पाणीपी दरमहा भरण्याची तसदी नगरपालिका घेत नसल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत जाते. थकबाकीवर दीडपट आकारणी होते. आज दीड कोटी रुपये पाणीपी बिलाचे पालखेड विभागाला येवला पालिकेला देणे आहे. हा सारा बोजा पाणीपी ग्राहकाला सोसावा लागतो. या सार्या अनियमिततेला जबाबदार कोण?
उत्पन्नवाढीसाठी येवला पालिकेने जरी पाणीपीवाढीचा निर्णय घेतला असला तरी, सर्वसामान्य ग्राहक मात्र यामुळे त्रासला जाणार आहे.
वीज, आरोग्य, पाणी व रस्ते या मूलभूत प्रश्नांसाठी पालिकेने कायम दक्ष रहावे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न व पाणीपीतील वाढ या बाबतीत विरोधी पक्षांचे नेमके धोरण काय? याबाबत भाजपा शहराध्यक्ष मनोज दिवटे यांना विचारले असता, दोन दिवसात आम्ही पक्षाची बैठक घेऊन याबाबत सहमतीने धोरण ठरवू असे सांगितले. पालिका तीन दिवसाआड वर्षातून केवळ तीन महिने पाणी देते. त्यामुळे पालिकेने पाणीपीत वाढ करू नये, नियमित व पुरेशा दाबाने शहरवासीयांना पाणी द्यावे, नंतरच पाणीपी वाढ करावी.
अर्धा इंची घरगुती नळ जोडणी घेण्यासाठी तब्बल ३० टक्के वाढीव पैसे मोजावे लागतील, तर पाऊण इंचीसाठी ३५ टक्के वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत.
मनमानीपद्धतीने पाणीपीची वाढ अयोग्य आहे. याबाबत समाजप्रबोधनासाठी हाऊस टू हाऊस पत्रके वाटून याबाबत जनजागृती करणार आहोत. पालिका प्रशासनाला दोन दिवसांत निवेदनही देणार आहोत.
आनंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, येवला.
शहरवासीयांना पाणीपुरवठा करताना मिळणार्या उत्पन्नापेक्षा जास्ती खर्च होतो. ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाणीपुरवठा योजना चालते. तोटा भरून काढण्यासाठी वाढ अपरिहार्य आहे. पाणीपीवाढीत काही तांत्रिक तफावत असल्यास दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- डॉ. दिलीप मेनकर, मुख्याधिकारी, येवला नगर परिषद