शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

यंदा ९३ मंडळांची गणेशोत्सवाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:57 IST

शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली.

नाशिक : शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली. विशेषत: जाचक नियमावली आल्यानंतर त्यावर निर्बंध आले आणि मंडळांची संख्या कमी होत गेली. डिजे, त्यानंतर वेळेची मर्यादा त्याचे उल्लंघन केल्यानेदेखील मंडळांचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. नोकरी, व्यवसाय सांभाळून हौसेने आणि सामाजिक बांधीलकीतून परिसरातील युवक आणि अन्य नागरिक मंडळ स्थापन करत असतात. परंतु त्यांना भलत्याच संकटांना सामोरे जावे लागत असल्याने कार्यकर्त्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली. तशी मंडळांची संख्या कमी होत गेली. गेल्या दोन वर्षांपासून मंडळांना अधिक नियमांचे पालन करावे लागत असून, जरा चूक झाली की थेट कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बहुतांशी मंडळांनी यंदा उत्सवाकडे पाठ फिरवली आहे.महापालिकेत ५६४ मंडळांनी अर्ज केला होता. त्यातील ५४४ मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली असून, वीस मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्यावर्षी महापालिकेने ६३७ मंडळांनी अर्ज केले होते. यंदा ५६४ मंडळांनीच अर्ज केल्याने ९३ मंडळांनी पाठ फिरवली आहे. यासंदर्भात अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असताना त्यांनी महापालिकेच्या जाचक नियमावलीचा संदर्भ दिला आहे. जाचक अटी आणि अन्य गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यांमुळे यंदा उत्सवच नको अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. उलट मंडळांनी या जाचक अटींना सामोरे जाण्यापेक्षा जमवलेल्या निधीतून पूरग्रस्तांनाच मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.जाचक नियमांमुळे मंडळांनी यंदा उत्सवाकडे पाठ फिरवली आहे. महापालिकेने यंदा आॅनलाइन मंडप मंजुरी आठ दिवस अगोदरच बंद केली. त्यामुळे गोंधळ झाला. अनेक मंडळे वर्गणी जमल्यानंतर ऐनवेळी मंडपासाठी परवानगी घेतात. परंतु त्यांची त्यामुळे अडचण झाली. नाशिकरोड येथे यंदा मंडळांची संख्या कमी झाली असून, जास्तीत जास्त सात ते आठ मोठी मंडळेच शिल्लक आहेत.- समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळगणेशोत्सव म्हटला की सार्वजनिक मंडळांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. मात्र यंदा नाशिक शहरात महपालिकेने मंडप नियमांची काटेकोर केलेली अंमलबजावणी आणि त्यातच पश्चिम महाराष्टÑात आलेला महापूर याचे निमित्त करून शहरातील ९३ मंडळांनी यंदा उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मंडप नियमावलीचा भंग केल्याने त्यासंदर्भात न्यायालयात मंडळाची नावे गेल्याने कार्यकर्ते धास्तावले आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक