शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

यंदा ९३ मंडळांची गणेशोत्सवाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:57 IST

शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली.

नाशिक : शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली. विशेषत: जाचक नियमावली आल्यानंतर त्यावर निर्बंध आले आणि मंडळांची संख्या कमी होत गेली. डिजे, त्यानंतर वेळेची मर्यादा त्याचे उल्लंघन केल्यानेदेखील मंडळांचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. नोकरी, व्यवसाय सांभाळून हौसेने आणि सामाजिक बांधीलकीतून परिसरातील युवक आणि अन्य नागरिक मंडळ स्थापन करत असतात. परंतु त्यांना भलत्याच संकटांना सामोरे जावे लागत असल्याने कार्यकर्त्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली. तशी मंडळांची संख्या कमी होत गेली. गेल्या दोन वर्षांपासून मंडळांना अधिक नियमांचे पालन करावे लागत असून, जरा चूक झाली की थेट कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बहुतांशी मंडळांनी यंदा उत्सवाकडे पाठ फिरवली आहे.महापालिकेत ५६४ मंडळांनी अर्ज केला होता. त्यातील ५४४ मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली असून, वीस मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्यावर्षी महापालिकेने ६३७ मंडळांनी अर्ज केले होते. यंदा ५६४ मंडळांनीच अर्ज केल्याने ९३ मंडळांनी पाठ फिरवली आहे. यासंदर्भात अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असताना त्यांनी महापालिकेच्या जाचक नियमावलीचा संदर्भ दिला आहे. जाचक अटी आणि अन्य गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यांमुळे यंदा उत्सवच नको अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. उलट मंडळांनी या जाचक अटींना सामोरे जाण्यापेक्षा जमवलेल्या निधीतून पूरग्रस्तांनाच मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.जाचक नियमांमुळे मंडळांनी यंदा उत्सवाकडे पाठ फिरवली आहे. महापालिकेने यंदा आॅनलाइन मंडप मंजुरी आठ दिवस अगोदरच बंद केली. त्यामुळे गोंधळ झाला. अनेक मंडळे वर्गणी जमल्यानंतर ऐनवेळी मंडपासाठी परवानगी घेतात. परंतु त्यांची त्यामुळे अडचण झाली. नाशिकरोड येथे यंदा मंडळांची संख्या कमी झाली असून, जास्तीत जास्त सात ते आठ मोठी मंडळेच शिल्लक आहेत.- समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळगणेशोत्सव म्हटला की सार्वजनिक मंडळांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. मात्र यंदा नाशिक शहरात महपालिकेने मंडप नियमांची काटेकोर केलेली अंमलबजावणी आणि त्यातच पश्चिम महाराष्टÑात आलेला महापूर याचे निमित्त करून शहरातील ९३ मंडळांनी यंदा उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मंडप नियमावलीचा भंग केल्याने त्यासंदर्भात न्यायालयात मंडळाची नावे गेल्याने कार्यकर्ते धास्तावले आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक