शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

यंदा ९३ मंडळांची गणेशोत्सवाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:57 IST

शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली.

नाशिक : शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली. विशेषत: जाचक नियमावली आल्यानंतर त्यावर निर्बंध आले आणि मंडळांची संख्या कमी होत गेली. डिजे, त्यानंतर वेळेची मर्यादा त्याचे उल्लंघन केल्यानेदेखील मंडळांचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. नोकरी, व्यवसाय सांभाळून हौसेने आणि सामाजिक बांधीलकीतून परिसरातील युवक आणि अन्य नागरिक मंडळ स्थापन करत असतात. परंतु त्यांना भलत्याच संकटांना सामोरे जावे लागत असल्याने कार्यकर्त्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली. तशी मंडळांची संख्या कमी होत गेली. गेल्या दोन वर्षांपासून मंडळांना अधिक नियमांचे पालन करावे लागत असून, जरा चूक झाली की थेट कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बहुतांशी मंडळांनी यंदा उत्सवाकडे पाठ फिरवली आहे.महापालिकेत ५६४ मंडळांनी अर्ज केला होता. त्यातील ५४४ मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली असून, वीस मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्यावर्षी महापालिकेने ६३७ मंडळांनी अर्ज केले होते. यंदा ५६४ मंडळांनीच अर्ज केल्याने ९३ मंडळांनी पाठ फिरवली आहे. यासंदर्भात अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असताना त्यांनी महापालिकेच्या जाचक नियमावलीचा संदर्भ दिला आहे. जाचक अटी आणि अन्य गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यांमुळे यंदा उत्सवच नको अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. उलट मंडळांनी या जाचक अटींना सामोरे जाण्यापेक्षा जमवलेल्या निधीतून पूरग्रस्तांनाच मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.जाचक नियमांमुळे मंडळांनी यंदा उत्सवाकडे पाठ फिरवली आहे. महापालिकेने यंदा आॅनलाइन मंडप मंजुरी आठ दिवस अगोदरच बंद केली. त्यामुळे गोंधळ झाला. अनेक मंडळे वर्गणी जमल्यानंतर ऐनवेळी मंडपासाठी परवानगी घेतात. परंतु त्यांची त्यामुळे अडचण झाली. नाशिकरोड येथे यंदा मंडळांची संख्या कमी झाली असून, जास्तीत जास्त सात ते आठ मोठी मंडळेच शिल्लक आहेत.- समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळगणेशोत्सव म्हटला की सार्वजनिक मंडळांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. मात्र यंदा नाशिक शहरात महपालिकेने मंडप नियमांची काटेकोर केलेली अंमलबजावणी आणि त्यातच पश्चिम महाराष्टÑात आलेला महापूर याचे निमित्त करून शहरातील ९३ मंडळांनी यंदा उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मंडप नियमावलीचा भंग केल्याने त्यासंदर्भात न्यायालयात मंडळाची नावे गेल्याने कार्यकर्ते धास्तावले आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक