शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

भाऊसाहेब हिरेंमुळेच यशवंतराव राज्याचे मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:57 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही राज्याच्या जडणघडणीत हिरे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, स्व. भाऊसाहेब हिरे नसते तर यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होऊ शकले नसते अशा शब्दात राष्टÑवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात हिरे कुटुंबीयांचा गौरव केला.

ठळक मुद्देशरद पवार : पुष्पाताई हिरे यांचा अभीष्टचिंतन सोहळा

नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही राज्याच्या जडणघडणीत हिरे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, स्व. भाऊसाहेब हिरे नसते तर यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होऊ शकले नसते अशा शब्दात राष्टÑवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात हिरे कुटुंबीयांचा गौरव केला.राज्याच्या माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त जाहीर अभीष्टचिंतन सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री विनायकदादा पाटील होते.यावेळी बोलताना पवार यांनी, स्वातंत्र्य चळवळीत नाशिक जिल्हा अग्रस्थानी होता, त्यावेळी त्या चळवळीचे नेतृत्व स्व. भाऊसाहेब हिरे यांच्याकडे होते. स्वातंत्र्यानंतरही सामान्य माणसाला स्वातंत्र्याची अपेक्षापूर्ती करण्याचे काम त्यांनी केले. कूळकायदा असो वा शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळण्याचा विषय, असो भाऊसाहेब यांचे योगदान महत्त्वाचे होते. एककाळ असा होता राज्यात हिरे व यशवंतराव चव्हाण यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा झडली होती. परंतु इतिहासाचे बारकाईने निरीक्षण केल्यास १९५६ साली मोरारजी देसाई यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते, परंतु त्यांची अविरोध निवड व्हावी अशी इच्छा होती. त्यावेळी स्व. भाऊसाहेब हिरे यांनी त्यांना विरोध केला व मतदान झाल्यास आपल्याला कमी मते मिळाली तरी चालतील, परंतु मोरारजी देसाई यांची अविरोध निवड होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.परिणामी देसाई यांनी माघार घेतली व त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, असे सांगितले. स्व. भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर व्यंकटराव व त्यानंतर पुष्पाताई हिरे यांच्यासोबत आपल्याला काम करण्याची संधी मिळाली असे सांगून पवार यांनी, पुष्पाताई हिरे यांनी लातूर भूकंप व मुंबई बॉम्बस्फोटातील जखमींची राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून केलेली सृश्रूषा कधीही विसरू शकणार नसल्याचे सांगितले.यावेळी विनायकदादा पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अपूर्व हिरे यांनी केले.व्यासपीठावर पुष्पाताई हिरेंसह प्रशांत हिरे, हेमंत टकले, समीर भुजबळ, अद्वय हिरे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, श्रीराम शेटे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, शोभा बच्छाव, दिलीप बनकर, माधवराव पाटील, राजेंद्र डोखळे, रंजन ठाकरे, तुषार शेवाळे, रवींद्र पगार, सरोज अहिरे, बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते.मातृतुल्य व्यक्तिमत्त्वपालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पाताई हिरे या शालीन व्यक्तिमत्त्वाच्या मातृतुल्य असल्याचा उल्लेख केला. हिरे कुटुंबीयांचे महाराष्टÑातील राजकारणातील योगदान विसरता येणार नसल्याचे सांगितले. मांजरपाडा प्रकल्पाबाबत प्रास्ताविकात अपूर्व हिरे यांनी केलेल्या उल्लेखाबाबत भुजबळ म्हणाले, गुजरातकडे वाहून जाणारे राज्याचे पाणी नाशिक, नगर व मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील़ महाराष्टाचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी सत्तेचा सारा उपयोग केला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSharad Pawarशरद पवार