शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बारावी परीक्षा ; नाशिक विभागातील जळगावात सर्वाधिक कॉपी प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 13:55 IST

बारावीची  परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून या पहिल्या तीन दिवांसामध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून त्यानंत सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे.शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी  विभागस्तराव २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये तीन दिवसात तब्बल ३१ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सद्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.

ठळक मुद्देबारावी परीक्षेत आतापर्यंत जळगावात सर्वाधिक कॉपी प्रकरणेनाशिक, नंदुरबार निरंक ; धुळ्यात चार, जळगावात 31 कॉपी प्रकरणे

नाशिक : बारावीची  परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून या पहिल्या तीन दिवांसामध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून त्यानंत सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे.शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी  विभागस्तराव २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये तीन दिवसात तब्बल ३१ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सद्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.बाराीवीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला १८ कॉपी बहाद्दरांवर कारवाई झाली होती. यात जळगावच्या सर्वाधिक १४ जणांचा समावेश होता. तर धुळ््यातून चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते. तर दुसºया दिवशी दुसऱ्या दिवशी हिंदीच्या पेपरला पकडलेले सर्वच्या सर्व पाच कॉपीबहाद्दर जळगावचेच होते. त्यानंतर शनिवारी (दि.१३) झालेल्या मातृभाषेच्या पेपरलाही जळगावमध्येच सर्वाधिक कॉपी १२ प्रकरणे समोर आल्याने आतापार्यंत झालेल्या तीन विषयाच्या पेपरमध्ये एकूण २५ कॉपी प्रकरणांपैकी जळगावमधील सर्वाधिक ३१ प्रकरणांचा समोर असून धुळयातील चार प्रकरणांचा समावेश आहे.विशेष म्हणजे नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या दिवसापासून एकही कॉपी प्रकरण समोर आलेले नाही. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांची कॉपी मूक्त परीक्षेकडे यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे यातून दिसते. 

कॉपी रोखण्याचे आव्हानमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेस गुरुवारी (दि.२१) इंग्रजी विषयाच्या पेपरने प्रारंभ झाला. विभागातील ६७ हजार ३५८ विद्यार्र्थ्यांनी हा पेपर दिला. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२२) विभागातील ३६ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात हिंदी, तर दुपार सत्रात ७४८ विद्यार्थ्यांनी पर्शियन भाषेचा  पेपर दिला.परीक्षेच्या तीसºया दिवशी शनिवारी (दि.२३) सकाळच्या सत्रात एकूण १ लाख २३ हजार ७८ विद्यार्थ्यांनी मराठीचा तर दुपार सत्रात विभागातील ७ हजार ५०५ विद्यार्थी उर्दु भाषेचा पेपर दिला. परीक्षेच्या पहिल्या तीन दिवसातच जळगामध्ये एकूण ३१ कॉपीप्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे विभागीय शिक्षण मंडळापुढे जळगावमधील गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२५) भौतिकशास्त्र, चिटणीसांची कार्यपद्धती व राज्यशास्त्र विषयांचे पेपर होणार आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थीJalgaonजळगावDhuleधुळे